शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
6
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
7
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
8
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
9
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
10
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
11
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
12
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
13
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
14
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
15
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
16
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
17
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
18
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
19
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
20
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

पंतप्रधान मोदींना काँग्रेसने विचारले दहा महत्त्वाचे प्रश्न, बिहारला खोटी आश्वासने का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 09:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावरून काँग्रेसने मोदी यांच्यावर लगेच हल्ला करून त्यांना १० प्रश्नांची उत्तरे मागून तुम्ही खोटे बोलत आहात, असा आरोप केला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावरून काँग्रेसने मोदी यांच्यावर लगेच हल्ला करून त्यांना १० प्रश्नांची उत्तरे मागून तुम्ही खोटे बोलत आहात, असा आरोप केला. हा आरोप आणि प्रश्नांचा थेट संबंध हा भाजप-जनता दल (यु) सरकारच्या कामकाजाबद्दल तयार केलेल्या आरोपपत्राशी आहे.

काँग्रेसने मोदी यांना विचारले की, केंद्र सरकार बिहारला विशेष राज्याचा दर्जा का देत नाही, ऊजार्मंत्री आर. के. सिंह यांनी बिहारच्या या मागणीला फेटाळून का लावले, त्यांची ही भूमिका तुम्हालाही मान्य आहे का? पक्षाचे नेते रणदीप सुरजेवाला, पवन खेडा यांनी दुसरा प्रश्न विचारला की, गेल्या निवडणुकीत ५०० कोटी गुंतवणुकीतून भागलपूरमध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा झाली होती त्याचे काय झाले? बिहारला खोटी आश्वासने का? २०१५ मध्ये कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली होती त्याचे काय झाले? बक्सरच्या चौसात १० हजार कोटी रुपये गुंतवणुकीतून होणाऱ्या १३०० मेगावॅट थर्मल पॉवर प्लांटचे पुढे काय झाले?

मनिहारी ते साहिदगंज पूल का? नाही? बनला? कारण त्याची घोषणा तर त्यांनी स्वत:च केली होती. चार हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा चार पदरी रस्ता का तयार झाला नाही? तुमची आश्वासने खोटी का? अशा अनेक आरोपांचे हे पत्र पक्षाने महागठबंधनकडून तयार करून घेतले आहे. ते प्रचारात मतदारांत वाटले जाईल म्हणजे त्यातून हे सिद्ध होईल की, मोदी खोटी आश्वासने देतात. 

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी