शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

India-China Faceoff: राहुल गांधींच्या बचावासाठी काँग्रेस मैदानात; भारत-चीन संघर्षावर PM मोदींना विचारले ७ प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 20:41 IST

India-China Faceoff: या सात प्रश्नांवर बोलणे हे पंतप्रधानांचे राजकीय कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

India-China Faceoff: काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेश येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली. यामध्ये दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. यावरून भाजपने आक्रमक होत राहुल गांधींवर पलटवार केला. आता राहुल गांधी यांच्या बचावासाठी काँग्रेस मैदानात उतरली असून, भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावरून पंतप्रधान मोदींना ७ प्रश्न विचारले आहेत. 

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. राहुल गांधी यांनी भारत आणि चीनच्या सैनिकांमधील संघर्षावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सरकार चीनच्या मुद्द्याकडे सतत दुर्लक्ष करत आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि लपवताही येत नाही. चीनची कारवाई सुरू आहे. चीन घुसखोरीच्या नाही, युद्धाच्या तयारीत आहेत. भारत सरकार झोपले आहे. मी त्यांना या संदर्भात तीन-चार वेळा बोललो. परराष्ट्र मंत्र्यांनी आपली समज वाढवली पाहिजे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यानंतर भाजपने आक्रमक होत राहुल गांधींच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. यावर आता काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 

पंतप्रधान चीनला का घाबरतात, त्यामागचे रहस्य काय?

काँग्रेसचे मीडिया विभागाचे प्रभारी पवन खेडा यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर टीका करताना काही प्रश्न विचारले आहेत. पंतप्रधान चीनला का घाबरतात, त्यामागचे रहस्य काय? काळ्या यादीत टाकलेल्या चिनी कंपन्यांना तुम्ही वारंवार कंत्राटे का देता? तुमचा चीनशी काय संबंध? अशी विचारणा केली आहे. तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एकामागून एक प्रश्न विचारले आहेत. तुम्ही २० जून २०२० रोजी पूर्व लडाखमधील भारतीय हद्दीत चीनकडून कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचे का सांगितले? मे २०२० पूर्वी नियमितपणे गस्त घालत असलेल्या पूर्व लडाखमध्ये हजारो चौरस किलोमीटरपर्यंत पोहोचण्यापासून चिनी लोकांना तुम्ही आमच्या सैन्याला का रोखू दिले? माउंटन स्ट्राइक कोअरची स्थापना करण्यासाठी १७ जुलै २०१३ रोजी कॅबिनेटने मंजूर केलेली योजना तुम्ही का सोडली? तुम्ही चिनी कंपन्यांना पीएम केअर्स फंडात योगदान देण्याची परवानगी का दिली? गेल्या दोन वर्षांत तुम्ही चीनमधून आयात विक्रमी पातळीवर का वाढू दिली? सीमेवरील परिस्थिती आणि चीनकडून आपल्याला भेडसावणाऱ्या आव्हानांवर संसदेत चर्चा होऊ नये, असा आग्रह का धरताय? तुम्ही १८ वेळा चीनच्या सर्वोच्च नेतृत्वाला भेटलात आणि अलीकडेच बाली येथे शी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर लगेचच चीनने तवांगमध्ये घुसखोरी सुरू केली आणि सीमेवर एकाच बाजूने बदल करणे सुरूच ठेवले. तुम्ही देशाला विश्वासात का घेत नाही? असे एकामागून एक प्रश्न विचारण्यात आले आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी एक निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले की, या सात प्रश्नांवर बोलणे हे पंतप्रधानांचे राजकीय कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी आहे. देशाला जाणून घ्यायचे आहे, असे म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :congressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारRahul Gandhiराहुल गांधी