शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

India-China Faceoff: राहुल गांधींच्या बचावासाठी काँग्रेस मैदानात; भारत-चीन संघर्षावर PM मोदींना विचारले ७ प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 20:41 IST

India-China Faceoff: या सात प्रश्नांवर बोलणे हे पंतप्रधानांचे राजकीय कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

India-China Faceoff: काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेश येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली. यामध्ये दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. यावरून भाजपने आक्रमक होत राहुल गांधींवर पलटवार केला. आता राहुल गांधी यांच्या बचावासाठी काँग्रेस मैदानात उतरली असून, भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावरून पंतप्रधान मोदींना ७ प्रश्न विचारले आहेत. 

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. राहुल गांधी यांनी भारत आणि चीनच्या सैनिकांमधील संघर्षावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सरकार चीनच्या मुद्द्याकडे सतत दुर्लक्ष करत आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि लपवताही येत नाही. चीनची कारवाई सुरू आहे. चीन घुसखोरीच्या नाही, युद्धाच्या तयारीत आहेत. भारत सरकार झोपले आहे. मी त्यांना या संदर्भात तीन-चार वेळा बोललो. परराष्ट्र मंत्र्यांनी आपली समज वाढवली पाहिजे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यानंतर भाजपने आक्रमक होत राहुल गांधींच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. यावर आता काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 

पंतप्रधान चीनला का घाबरतात, त्यामागचे रहस्य काय?

काँग्रेसचे मीडिया विभागाचे प्रभारी पवन खेडा यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर टीका करताना काही प्रश्न विचारले आहेत. पंतप्रधान चीनला का घाबरतात, त्यामागचे रहस्य काय? काळ्या यादीत टाकलेल्या चिनी कंपन्यांना तुम्ही वारंवार कंत्राटे का देता? तुमचा चीनशी काय संबंध? अशी विचारणा केली आहे. तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एकामागून एक प्रश्न विचारले आहेत. तुम्ही २० जून २०२० रोजी पूर्व लडाखमधील भारतीय हद्दीत चीनकडून कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचे का सांगितले? मे २०२० पूर्वी नियमितपणे गस्त घालत असलेल्या पूर्व लडाखमध्ये हजारो चौरस किलोमीटरपर्यंत पोहोचण्यापासून चिनी लोकांना तुम्ही आमच्या सैन्याला का रोखू दिले? माउंटन स्ट्राइक कोअरची स्थापना करण्यासाठी १७ जुलै २०१३ रोजी कॅबिनेटने मंजूर केलेली योजना तुम्ही का सोडली? तुम्ही चिनी कंपन्यांना पीएम केअर्स फंडात योगदान देण्याची परवानगी का दिली? गेल्या दोन वर्षांत तुम्ही चीनमधून आयात विक्रमी पातळीवर का वाढू दिली? सीमेवरील परिस्थिती आणि चीनकडून आपल्याला भेडसावणाऱ्या आव्हानांवर संसदेत चर्चा होऊ नये, असा आग्रह का धरताय? तुम्ही १८ वेळा चीनच्या सर्वोच्च नेतृत्वाला भेटलात आणि अलीकडेच बाली येथे शी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर लगेचच चीनने तवांगमध्ये घुसखोरी सुरू केली आणि सीमेवर एकाच बाजूने बदल करणे सुरूच ठेवले. तुम्ही देशाला विश्वासात का घेत नाही? असे एकामागून एक प्रश्न विचारण्यात आले आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी एक निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले की, या सात प्रश्नांवर बोलणे हे पंतप्रधानांचे राजकीय कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी आहे. देशाला जाणून घ्यायचे आहे, असे म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :congressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारRahul Gandhiराहुल गांधी