शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

India-China Faceoff: राहुल गांधींच्या बचावासाठी काँग्रेस मैदानात; भारत-चीन संघर्षावर PM मोदींना विचारले ७ प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 20:41 IST

India-China Faceoff: या सात प्रश्नांवर बोलणे हे पंतप्रधानांचे राजकीय कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

India-China Faceoff: काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेश येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली. यामध्ये दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. यावरून भाजपने आक्रमक होत राहुल गांधींवर पलटवार केला. आता राहुल गांधी यांच्या बचावासाठी काँग्रेस मैदानात उतरली असून, भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावरून पंतप्रधान मोदींना ७ प्रश्न विचारले आहेत. 

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. राहुल गांधी यांनी भारत आणि चीनच्या सैनिकांमधील संघर्षावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सरकार चीनच्या मुद्द्याकडे सतत दुर्लक्ष करत आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि लपवताही येत नाही. चीनची कारवाई सुरू आहे. चीन घुसखोरीच्या नाही, युद्धाच्या तयारीत आहेत. भारत सरकार झोपले आहे. मी त्यांना या संदर्भात तीन-चार वेळा बोललो. परराष्ट्र मंत्र्यांनी आपली समज वाढवली पाहिजे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यानंतर भाजपने आक्रमक होत राहुल गांधींच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. यावर आता काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 

पंतप्रधान चीनला का घाबरतात, त्यामागचे रहस्य काय?

काँग्रेसचे मीडिया विभागाचे प्रभारी पवन खेडा यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर टीका करताना काही प्रश्न विचारले आहेत. पंतप्रधान चीनला का घाबरतात, त्यामागचे रहस्य काय? काळ्या यादीत टाकलेल्या चिनी कंपन्यांना तुम्ही वारंवार कंत्राटे का देता? तुमचा चीनशी काय संबंध? अशी विचारणा केली आहे. तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एकामागून एक प्रश्न विचारले आहेत. तुम्ही २० जून २०२० रोजी पूर्व लडाखमधील भारतीय हद्दीत चीनकडून कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचे का सांगितले? मे २०२० पूर्वी नियमितपणे गस्त घालत असलेल्या पूर्व लडाखमध्ये हजारो चौरस किलोमीटरपर्यंत पोहोचण्यापासून चिनी लोकांना तुम्ही आमच्या सैन्याला का रोखू दिले? माउंटन स्ट्राइक कोअरची स्थापना करण्यासाठी १७ जुलै २०१३ रोजी कॅबिनेटने मंजूर केलेली योजना तुम्ही का सोडली? तुम्ही चिनी कंपन्यांना पीएम केअर्स फंडात योगदान देण्याची परवानगी का दिली? गेल्या दोन वर्षांत तुम्ही चीनमधून आयात विक्रमी पातळीवर का वाढू दिली? सीमेवरील परिस्थिती आणि चीनकडून आपल्याला भेडसावणाऱ्या आव्हानांवर संसदेत चर्चा होऊ नये, असा आग्रह का धरताय? तुम्ही १८ वेळा चीनच्या सर्वोच्च नेतृत्वाला भेटलात आणि अलीकडेच बाली येथे शी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर लगेचच चीनने तवांगमध्ये घुसखोरी सुरू केली आणि सीमेवर एकाच बाजूने बदल करणे सुरूच ठेवले. तुम्ही देशाला विश्वासात का घेत नाही? असे एकामागून एक प्रश्न विचारण्यात आले आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी एक निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले की, या सात प्रश्नांवर बोलणे हे पंतप्रधानांचे राजकीय कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी आहे. देशाला जाणून घ्यायचे आहे, असे म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :congressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारRahul Gandhiराहुल गांधी