शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

'न्याय योजना' लागू केल्यास देश 4 पावलं मागे, निती आयोगााला राहुल गांधीची स्कीम अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 15:14 IST

राहुल गांधींच्या या घोषणेनेतर निती आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका केली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कुठलाही विचार न करता न्याय योजनेची घोषणा केली. या योजनेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिमाण होईल. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस काहीही घोषणा करतेय, असे निती आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींची न्याय योजना लागू झाल्यास देश 4 पाऊले मागे पडेल, असेही राजीव त्यागी यांनी म्हटले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन न्याय योजनेची घोषणा केली. देशात काँग्रेसचे सरकार आल्यास गरिबांना सन्मानाने जगता यावे, यासाठी किमान मासिक उत्पन्न 12 हजार रुपये असणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यासाठी काँग्रेस सरकार न्याय योजना लागू करेल. त्यामुळे देशातील 20 टक्केपेक्षा अधिक कुटुबांना याचा लाभ होऊन देशातील गरिबी दूर होईल, असे राहुल गांधींनी सांगितले.

राहुल गांधींच्या या घोषणेनेतर निती आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका केली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसकडून काहीही घोषणा करण्यात येत आहेत. काँग्रेसकडून हा जुनाच पॅटर्न राबविण्यात येत आहे. देशातील गरिबी ही 1966 सालीच दूर करण्याची घोषणा केली होती. तसेच वन रँक वन पेंशनची अंमलबजावणी काँग्रेसच्या नंतरच झाली. त्यामुळे निवडणुकांचा मुद्दा बनविण्यासाठी काँग्रेसने ही घोषणा केल्याचं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधींची ही योजना म्हणजे लोकांना काम न करण्यास प्रोत्साहीत करणारी ठरेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेही राहुल गांधींच्या योजनेची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसच्या या योजनेमुळे देशाचे आर्थिक गणित बिघडेल किंवा सराकारला महत्त्वाच्या खर्चात कपात करावी लागले. पण, सद्यस्थितीत या दोन्ही बाबी शक्य नसल्याचे आर्थिक परिषदेने म्हटले आहे. 

 

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकRahul Gandhiराहुल गांधी