पावसाळी अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार : पत्रकार परिषदेत दिली माहिती
By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:17+5:302015-07-06T23:34:17+5:30
सोलापूर :

पावसाळी अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार : पत्रकार परिषदेत दिली माहिती
स लापूर : येत्या पावसाळी अधिवेशनात कोणते प्रश्न मांडायचे, कोणत्या विषयावर सरकारला कोंडीत पकडायचे यासह अनेक विषयांवर चर्चा करून पावसाळी अधिवेशनासंदर्भात व्यूहरचना आखण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचे दोन्ही विरोधी पक्षनेते काम करणार असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली़राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी अजित पवार हे सोेलापूर दौर्यावर आले होते़ यानिमित्त हॉटेल बालाजी सरोवर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते़ यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षनिरीक्षक प्रदीप गारटकर, आ़ दीपकआबा साळुंखे-पाटील, माजी आमदार राजन पाटील, आ़ बबनदादा शिंदे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मनोहर सपाटे, महेश गादेकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार, दिलीप कोल्हे आदी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते़पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्याचे पावसाळी अधिवेशन १३ जुलै रोजी होणार आहे़ या अधिवेशनात शासनाला विविध विषयावर कोंडीत पकडण्याचा काँग्र्रेस व राष्ट्रवादीचा डाव असणार आहे़ भाजप सरकार हे फसवे सरकार आहे़ निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची आजपर्यंत पूर्तता केली नाही़ दरम्यान, दाऊदविषयीची फाईल शरद पवार मुख्यमंत्री असताना आली होती़ मात्र त्यावेळी शरद पवार यांनी हा प्रस्ताव नाकारला होता़ एमआयएम पक्ष हा चुकीचा प्रचार करून युवकांना प्रभावित करीत असल्याची टीकाही अजित पवार यांनी केली़यावेळी माजी महापौर कय्युम बुर्हाण, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल, बाळराजे पाटील आदी राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़इन्फो बॉक्स़़़़़़़़़़मुुंडे, तावडेंनी राजीनामा द्यावामहिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळा तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची बोगस पदवी व अग्निशमन यंत्रात प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती समोर येत आहे़ जोपर्यंत आरोप सिध्द होत नाहीत तोपर्यंत पंकजा मुंडे व विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे़इन्फो बॉक्स़़़़़़़़़़़रमेश कदम चुकीचेच़़़प्रशासनाविरोधात दबाव आणण्यासाठी हजारोंच्या संख्येने काढलेला मोर्चा हा चुकीचाच आहे़ शिवाय अटक करणार नाही असे पोलिसांचे पत्र असतानाही अटक करण्यासाठी आ़ रमेश कदम यांनी पोलीस ठाण्यावर धाव घेणे अयोग्य आहे़ आ़ रमेश कदम यांनी प्रशासनाच्या विरोधात घेतलेली भूमिका ही चुकीचीच आहे़ त्यांना तुर्तास पक्षातर्फे समज देणार आहे़ त्यानंतरही सुधारणा न झाल्यास पक्षातर्फे कारवाई करण्यात येईल, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला़इन्फो बॉक्स़़़़़़़़़़नेत्यांची बेशिस्त खपवून घेणार नाहीराष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य द्यावे़ राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने कायदा मोडू नये़ प्रशासनाच्या मदतीने विकासकामे करावीत़ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अथवा कार्यकर्त्यांनी बेशिस्त वर्तन केल्यास त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले़