शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

" जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील"

By बाळकृष्ण परब | Updated: October 17, 2020 13:19 IST

Article 370 News : ३७० हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी करणाऱ्या पी. चिदंबरम यांच्यावर भाजपाचे नेते मुख्यात अब्बास नक्वी यांनी जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देकलम ३७० रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर, लेह, कारगिलमधील ३७० समस्या सुटण्याचा मार्ग झाला मोकळा कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेमध्ये सकारात्मक वातावरण काँग्रेस आणि त्यांचे बगलबच्चे असलेल्या मित्रांना कलम ३७० पुन्हा लागू करता येईल, असे वाटत असेल. तर ते मुंगेरीलालचे स्वप्न ठरेल

नवी दिल्ली - माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी काल कलम ३७० बाबत केलेल्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. कलम ३७० हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी करणाऱ्या पी. चिदंबरम यांच्यावर भाजपाचे नेते मुख्यात अब्बास नक्वी यांनी जोरदार टीका केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील, असा टोला मुख्यार अब्बास नक्वी यांनी लगावला आहे.पी. चिदंबरम यांनी कलम ३७० बाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील. कलम ३७० रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर, लेह, कारगिलमधील ३७० समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेमध्ये सकारात्मक वातावरण आहे. मत्र असे असतानाही काँग्रेस आणि त्यांचे बगलबच्चे असलेल्या मित्रांना कलम ३७० पुन्हा लागू करता येईल, असे वाटत असेल. तर ते मुंगेरीलालचे स्वप्न ठरेल, असा चिमटाही नक्वी यांनी काढला.जम्म-काश्मीरमधील मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांनी गुरुवारी एका बैठकीचे आयोजन करत जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती. तसेच या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी काश्मिरी पक्षांनी एका आघाडीची घोषणा केली आहे. ही आघाडी कलम ३७० च्या मागणीसांठी संबंधित सर्व पक्षांशी चर्चा सुरू करणार असल्याचे म्हटले होते. यासाठीची बैठक नॅशनल कॉन्फ्रन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला पीडीपीच्या अध्यक्षा महेबुबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फ्रन्सचे सज्जाद लोन, पीपल्स मुव्हमेंटचे नेते जावेद मीर आणि माकपाचे नेते मोहम्मद युसूप तारिगामी हे उपस्थित होते. दरम्यान, या आघाडीला पी. चिदंबरम यांना पाठिंबा देत कलम ३७० रद्द करण्याची मागणी केली होती.कलम ३७०बाबत काय म्हणाले होते पी. चिदंबरमकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यात यावे, असे विधान केले आहे. तसेच या मागणीसाठी काश्मिरी पक्षांनी केलेल्या आघाडीलाही पाठिंबा दिला आहे. पी. चिदंबरम यांनी सांगितले की, केंद्र सरकारने कलम ३७० हटवण्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांचे अधिकार परत मिळवण्यासाठी मुख्य प्रवाहातील पक्षांनी घटनात्मक लढाई लढण्यासाठी एकत्र येण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशातील नागरिकांनी स्वागत केले पाहिजे. केंद्र सरकारने मुख्य प्रवाहातील पक्ष आणि आणि जम्मू काश्मीरमधील जनतेकडे ते देशविरोधी असल्याच्या नजरेने पाहणे बंद केले पाहिजे. काँग्रेस जम्मू काश्मीरमील जनतेचे अधिकार परत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी मनमानी पद्धतीने घेतलेला असंवैधानिक निर्णय मागे घेतला पाहिजे, असे चिदंबरम म्हणाले.

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण