शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
4
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
5
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
6
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
7
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
8
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
9
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
10
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
11
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
12
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
13
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
14
'सैराट'मधील इंटिमेट सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली- "मी घाबरले होते, पण..."
15
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
16
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
17
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
19
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
Daily Top 2Weekly Top 5

" जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील"

By बाळकृष्ण परब | Updated: October 17, 2020 13:19 IST

Article 370 News : ३७० हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी करणाऱ्या पी. चिदंबरम यांच्यावर भाजपाचे नेते मुख्यात अब्बास नक्वी यांनी जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देकलम ३७० रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर, लेह, कारगिलमधील ३७० समस्या सुटण्याचा मार्ग झाला मोकळा कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेमध्ये सकारात्मक वातावरण काँग्रेस आणि त्यांचे बगलबच्चे असलेल्या मित्रांना कलम ३७० पुन्हा लागू करता येईल, असे वाटत असेल. तर ते मुंगेरीलालचे स्वप्न ठरेल

नवी दिल्ली - माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी काल कलम ३७० बाबत केलेल्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. कलम ३७० हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी करणाऱ्या पी. चिदंबरम यांच्यावर भाजपाचे नेते मुख्यात अब्बास नक्वी यांनी जोरदार टीका केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील, असा टोला मुख्यार अब्बास नक्वी यांनी लगावला आहे.पी. चिदंबरम यांनी कलम ३७० बाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील. कलम ३७० रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर, लेह, कारगिलमधील ३७० समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेमध्ये सकारात्मक वातावरण आहे. मत्र असे असतानाही काँग्रेस आणि त्यांचे बगलबच्चे असलेल्या मित्रांना कलम ३७० पुन्हा लागू करता येईल, असे वाटत असेल. तर ते मुंगेरीलालचे स्वप्न ठरेल, असा चिमटाही नक्वी यांनी काढला.जम्म-काश्मीरमधील मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांनी गुरुवारी एका बैठकीचे आयोजन करत जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती. तसेच या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी काश्मिरी पक्षांनी एका आघाडीची घोषणा केली आहे. ही आघाडी कलम ३७० च्या मागणीसांठी संबंधित सर्व पक्षांशी चर्चा सुरू करणार असल्याचे म्हटले होते. यासाठीची बैठक नॅशनल कॉन्फ्रन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला पीडीपीच्या अध्यक्षा महेबुबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फ्रन्सचे सज्जाद लोन, पीपल्स मुव्हमेंटचे नेते जावेद मीर आणि माकपाचे नेते मोहम्मद युसूप तारिगामी हे उपस्थित होते. दरम्यान, या आघाडीला पी. चिदंबरम यांना पाठिंबा देत कलम ३७० रद्द करण्याची मागणी केली होती.कलम ३७०बाबत काय म्हणाले होते पी. चिदंबरमकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यात यावे, असे विधान केले आहे. तसेच या मागणीसाठी काश्मिरी पक्षांनी केलेल्या आघाडीलाही पाठिंबा दिला आहे. पी. चिदंबरम यांनी सांगितले की, केंद्र सरकारने कलम ३७० हटवण्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांचे अधिकार परत मिळवण्यासाठी मुख्य प्रवाहातील पक्षांनी घटनात्मक लढाई लढण्यासाठी एकत्र येण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशातील नागरिकांनी स्वागत केले पाहिजे. केंद्र सरकारने मुख्य प्रवाहातील पक्ष आणि आणि जम्मू काश्मीरमधील जनतेकडे ते देशविरोधी असल्याच्या नजरेने पाहणे बंद केले पाहिजे. काँग्रेस जम्मू काश्मीरमील जनतेचे अधिकार परत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी मनमानी पद्धतीने घेतलेला असंवैधानिक निर्णय मागे घेतला पाहिजे, असे चिदंबरम म्हणाले.

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण