शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

काँग्रेस व मित्रपक्षांनी लढाई अर्ध्यावरच सोडली - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 5:16 AM

काँग्रेस व मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांची लढाई अर्ध्यावरच सोडली असून, त्यामुळे भाजपच पुन्हा केंद्रात सत्तेवर येणार हे स्पष्ट आहे असा दावा पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी केला.

फतेहबाद - काँग्रेस व मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांची लढाई अर्ध्यावरच सोडली असून, त्यामुळे भाजपच पुन्हा केंद्रात सत्तेवर येणार हे स्पष्ट आहे असा दावा पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी केला.निवडणूक प्रचार सभेत ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा वाढला आहे. यंदाच्या निवडणुकांतही जनतेचा आम्हालाच पाठिंबा आहे हे २३ मे रोजी लागणाऱ्या निकालांतून दिसून येईल. फिर एक बार मोदी सरकार ही घोषणा खरी होणार आहे.काँग्रेस व विरोधी पक्षांच्या आघाडीने निवडणुकांची लढाई अर्ध्यावरच सोडून दिली आहे. देशामध्ये दुबळे सरकार यावे, अशी विरोधी पक्षांची इच्छा धुळीला मिळणार आहे. काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराचे पीक घेतले. हरियाणा व अन्य राज्यांमध्ये याचे अनेक पुरावे सापडतील. निवडणुकांचे आतापर्यंत पाच टप्पे पार पडले आहेत. सहाव्या टप्प्यात १० लोकसभा जागांसाठी १२ मे रोजी मतदान आहे. (वृत्तसंस्था)नोकऱ्यांचा मुद्दा चर्चेतहरीयाणामध्ये मोदी, जाट व नोक-या हे तीन मुद्दे प्रचारात प्रभावी ठरले आहेत. मोदी सरकारच्या बाजूने किंवा विरोधात जोरात प्रचार सुरू आहे. या राज्यात जाट समुदायाची संख्या २६ टक्के आहे. जाटांनी आपल्या मागण्यांसाठी पूर्वी हिंसक आंदोलन केले होते. त्यांच्या मागण्या मान्य करू असा पवित्रा सर्वच पक्षांनी घेतला आहे. राज्यात भाजपचे सरकार आहे.अनेकांना आम्ही सरकारी नोक-यांत सामावून घेतले असल्याचा दावा भाजप करत आहे, तर काँग्रेसने ‘न्याय’ योजनेला प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक