शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

“आम्हाला निवडणुका लढवता येतात”; जागावाटपावरुन काँग्रेसने तृणमूलला चांगलेच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 09:47 IST

Lok Sabha Election 2024 TMC Vs Congress: लोकसभा जागावाटपावरून काँग्रेस आणि तृणमूलमधील संघर्ष टोकाला जाताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

Lok Sabha Election 2024 TMC Vs Congress: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हळूहळू प्रचाराला सुरुवात होत आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत. जागावाटपाचे फॉर्म्युले तयार केले जात आहेत. विरोधकांची इंडिया आघाडी भाजपाला टक्कर देण्याचा मानस घेऊन काम करत असली तरी जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला अवघ्या दोन जागा देण्याचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसने ठेवला आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद टोकाला जाताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून काँग्रेस आणि तृणमूलमध्ये खटके उडताना दिसत असून, नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १० ते १२ लोकसभा मतदारसंघांची मागणी अवास्तव असल्याचे सांगून जागावाटपावरील चर्चेला उशीर केल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलने काँग्रेसला फक्त दोन जागा देऊ केल्या आहेत. 

काँग्रेसने अनेकवेळा १०-१२ जागांची मागणी केली आहे

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूलचा बालेकिल्ला असलेल्या बीरभूम येथील पक्ष युनिटच्या संघटनात्मक बैठकीत याबाबत मार्गदर्शन केले. अंतर्गत बैठकीत ममता बॅनर्जींनी सदर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी तृणमूलच्या गरजेवर भर देत पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्याची माहिती देण्यात येत आहे. काँग्रेससोबत जागावाटपाच्या चर्चेचा विचार करण्याची गरज नाही, असे आमच्या पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितले. पक्षाने दोन जागांची ऑफर दिली होती, परंतु काँग्रेसने अनेकवेळा १०-१२ जागांची मागणी केली आहे, अशी माहिती एका तृणमूल नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवरून दिली आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसही मागे हटण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ममता बॅनर्जींच्या दयेवर निवडणुका लढवल्या जाणार नाहीत. ममता बॅनर्जी ज्या जागा आम्हाला सोडणार आहेत त्या दोन्ही जागांवर काँग्रेस पक्षाने भाजपा आणि टीएमसीचा पराभव केला आहे. निवडणूक कशी लढवायची हे काँग्रेस पक्षाला माहिती आहे, असा पलटवार अधीर रंजन चौधरी यांनी केला.

 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा