शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

१ वर्ष राहुल गांधी भेटीचा प्रयत्न, PMची ४ दिवसांत वेळ मिळाली; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 12:15 IST

Congress Acharya Pramod Krishnam News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे सोपे आहे, पण राहुल गांधी यांना नाही, अशी टीका करण्यात आली आहे.

Congress Acharya Pramod Krishnam News: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. ज्या राज्यातून ही यात्रा जात आहे, तिथे काँग्रेसला काही ना काही फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून काँग्रेससाठी काम केलेले नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. तर अनेक काँग्रेस नेते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. एकूणच काँग्रेसची परिस्थिती बिकट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून, एका काँग्रेस नेत्याने राहुल गांधी भेटीवरून पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 

राहुल गांधी यांना गेल्या वर्षभरापासून भेटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्यापही यश आलेले नाही. योग्य पद्धतीने संपर्कही होत नाही. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत आहेत. कदाचित ते व्यस्त असतील. अधिक कोणाला भेटायची इच्छा नसेल. माझा संदेश राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवला जात नसेल, असा दावा काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. अलीकडेच आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीचा अनुभवही आचार्य कृष्णम यांनी शेअर केला.

पंतप्रधान मोदी यांना भेटणे सोपे आहे पण राहुल गांधींना नाही

आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे सोपे आहे, पण राहुल गांधी यांना नाही. पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी पीएमओ कार्यालयात वेळ मागितली होती. ४ दिवसांत कार्यालयाकडून पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची वेळ मिळाली, असे त्यांनी नमूद केले. अलीकडेच श्री कल्कि धाम भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनाही भेटले होते. 

दरम्यान, आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर टीका केली. पक्षातील बड्या नेत्यांनी आपली मर्यादा आणि भाषा सांभाळली पाहिजे. कार्यकर्त्यांमधून पक्ष निर्माण होतो. कार्यकर्ता मेहनती आणि धाडसी असतो. हा कोणा एका पक्षाचा प्रश्न नाही. सर्वच पक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच पायावर उभे आहेत. काँग्रेसही कार्यकर्त्यांच्या पायावर उभा आहे. ज्या प्रकारची भाषा वापरली गेली, ती केवळ मलाच नाही तर सर्व कार्यकर्त्यांना दुखावणारी होती. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा