शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

१ वर्ष राहुल गांधी भेटीचा प्रयत्न, PMची ४ दिवसांत वेळ मिळाली; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 12:15 IST

Congress Acharya Pramod Krishnam News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे सोपे आहे, पण राहुल गांधी यांना नाही, अशी टीका करण्यात आली आहे.

Congress Acharya Pramod Krishnam News: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. ज्या राज्यातून ही यात्रा जात आहे, तिथे काँग्रेसला काही ना काही फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून काँग्रेससाठी काम केलेले नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. तर अनेक काँग्रेस नेते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. एकूणच काँग्रेसची परिस्थिती बिकट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून, एका काँग्रेस नेत्याने राहुल गांधी भेटीवरून पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 

राहुल गांधी यांना गेल्या वर्षभरापासून भेटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्यापही यश आलेले नाही. योग्य पद्धतीने संपर्कही होत नाही. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत आहेत. कदाचित ते व्यस्त असतील. अधिक कोणाला भेटायची इच्छा नसेल. माझा संदेश राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवला जात नसेल, असा दावा काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. अलीकडेच आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीचा अनुभवही आचार्य कृष्णम यांनी शेअर केला.

पंतप्रधान मोदी यांना भेटणे सोपे आहे पण राहुल गांधींना नाही

आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे सोपे आहे, पण राहुल गांधी यांना नाही. पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी पीएमओ कार्यालयात वेळ मागितली होती. ४ दिवसांत कार्यालयाकडून पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची वेळ मिळाली, असे त्यांनी नमूद केले. अलीकडेच श्री कल्कि धाम भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनाही भेटले होते. 

दरम्यान, आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर टीका केली. पक्षातील बड्या नेत्यांनी आपली मर्यादा आणि भाषा सांभाळली पाहिजे. कार्यकर्त्यांमधून पक्ष निर्माण होतो. कार्यकर्ता मेहनती आणि धाडसी असतो. हा कोणा एका पक्षाचा प्रश्न नाही. सर्वच पक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच पायावर उभे आहेत. काँग्रेसही कार्यकर्त्यांच्या पायावर उभा आहे. ज्या प्रकारची भाषा वापरली गेली, ती केवळ मलाच नाही तर सर्व कार्यकर्त्यांना दुखावणारी होती. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा