शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

“रामाचा विरोध करणारे लोक नास्तिक, राजकारणात राहण्याचा अधिकार नाही”: आचार्य प्रमोद कृष्णम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 11:03 IST

Congress Acharya Pramod Krishnam News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पलटवार केला आहे.

Congress Acharya Pramod Krishnam News ( Marathi News ): अयोध्येत रेल्वे स्थानक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणानंतर आता सर्वांना आस लागली आहे ती, रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, एकाबाजूला सोहळ्याला जावे की नाही, यावरून विरोधकांमध्ये संभ्रम असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला राम मंदिराच्या सोहळ्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला आहे. 

आगामी लोकसभा निवडणूक होईपर्यंत पंतप्रधान कार्यालय अयोध्येत हलवावे. कारण हे सरकार अयोध्येतूनच चालेल. हे लोक आगामी काळात रामाच्या नावाने लोकांची मते मागतील. कधी पुलवामासारखा हल्ला घडवून आणतील तर कधी आमच्यापेक्षा मोठा रामभक्त कोणीही नाही, असे म्हणतील. राम मंदिरासाठी आम्ही, आमच्या पक्षाने आणि आमच्या लोकांनी सगळे काही दिले आहे. प्रसंगी रक्त सांडले आहे. पण आम्ही कधी असले राजकारण केले नाही, भविष्यात करणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उत्तर देत, चांगलाच पटलवाट केला आहे. 

रामाचा विरोध करणारे लोक नास्तिक, राजकारणात राहण्याचा अधिकार नाही

प्रभू श्रीरामांचा विरोध करणारे हे लोक नास्तिक आहेत. त्यांना भारताच्या राजकारणात राहण्याचा अधिकार नाही. श्रीरामांचा विरोध करायचा आणि भारतात राजकारण करायचे, हे वाईट आहे. अशा राजकारण्यांमुळे भारतातील जनतेला दुःख होते. आता राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. हा भारताचा उत्सव आहे. या उत्सव काळात नकारात्मकतेला थारा असू नये. ही आपली संस्कृती नाही. ज्यांना राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रण मिळाले ते त्यांचे सौभाग्य आहे. निमंत्रण मिळूनही जे लोक मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाहीत हे त्यांचे दुर्भाग्य आहे, अशी टीका कृष्णम यांनी केली.

दरम्यान, अशी टीका होणे आपल्या देशाचे मोठे दुर्दैव आहे. लोकशाहीत असे काही होऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करा, त्यांच्या निर्णयांचा निषेध नोंदवा. परंतु, त्यांचा तिरस्कार करू नका. काही लोक मोदींचा तिरस्कार करण्यात स्वतःचा सत्यानाश करून घेत आहेत. विरोधी पक्षतील काही नेते असे आहेत ज्यांनी स्वतःचे सरकार पाडले आहे. हा स्वतःचा सत्यानाशच आहे. ही मोठी नारात्मकता आहे. लोकशाहीत नकारात्मकतेला स्थान असू नये, असे प्रमोद कृष्णम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. 

टॅग्स :congressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या