शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या 9 वर्षात 23 दिग्गज नेत्यांनी काँग्रेस सोडली; कारण एकच- 'राहुल गांधी ऐकत नाहीत...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 18:58 IST

2014 नंतर अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांसह पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला. पाहा यादी...

Congress News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर अडचणीत आलेल्या काँग्रेसला गेल्या दोन दिवसांत दोन मोठे झटके बसले आहेत. ज्येष्ठ नेते एके अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटनी गुरुवारी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनीही शुक्रवारी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किरण रेड्डी यांनी काँग्रेस हायकमांडच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

एखाद्या काँग्रेस नेत्याने पक्ष सोडताना हायकमांडवर प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राहुल गांधींवर गंभीर आरोप केले होते. आझाद यांची गणना गांधी घराण्याच्या जवळच्या व्यक्तींमध्ये होते. दरम्यान, गेल्या 9 वर्षात जवळपास 23 बडे नेते काँग्रेसमधून बाहेर गेले आहेत. विशेष म्हणजे या सर्व नेत्यांनी काँग्रेस सोडण्यास हायकमांडला जबाबदार धरले आहे. यात त्यांचा रोख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर होता.

कोणत्या नेत्याने कधी पक्ष सोडला?1. जगदंबिका पाल- 2014 

2. चौधरी बिरेंदर सिंग- ऑगस्ट 2014 

3. अजित जोगी- 2015

4. हिमंता बिस्वा सरमा- 2015

5. गिरीधर गमंग- 2015

6. एसएम कृष्णा- 2017 

7. शंकर सिंह वाघेला- 2017

8. एनडी तिवारी- 2017

9. विजय बहुगुणा- 2016

10. रिटा बहुगुणा जोशी- 2016

11. अशोक चौधरी- 2018 

12. नारायण राणे- 2016 

14. अल्पेश ठाकोर- 2018 

15. राधाकृष्ण विखे पाटील- 2019 

16. टॉम वडाक्कन- 2019

17. सतपाल महाराज- 2014 

18. अमरिंदर सिंग- 2022 

19. जितिन प्रसाद- 2021 

20. ज्योतिरादित्य सिंधिया- 2019 

21. आरपीएन सिंह- 2022

22. कपिल सिब्बल- 2020 

23. गुलाम नबी आझाद- 2022 

या 23 नेत्यांशिवाय इतर अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. यामध्ये प्रियांका चतुर्वेदी, हार्दिक पटेल, रिपुन बोरा, सुष्मिता देव, विश्वजित राणे, कीर्ती आझाद आणि ललितेश पती त्रिपाठी यांच्या नावांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्थलांतरामुळे आसाम, यूपी या राज्यांमध्ये काँग्रेस खूपच कमकुवत झाली आहे. सातत्याने नेत्यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसमधील हायकमांडवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या वर्षी उदयपूरमध्ये पक्षाने याबाबत चर्चा केली होती, मात्र या चर्चेनंतरही अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. हे थांबवण्यासाठी काँग्रेसने दोन मोठे निर्णय घेतल्याचे सांगितले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाPoliticsराजकारण