शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

गेल्या 9 वर्षात 23 दिग्गज नेत्यांनी काँग्रेस सोडली; कारण एकच- 'राहुल गांधी ऐकत नाहीत...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 18:58 IST

2014 नंतर अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांसह पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला. पाहा यादी...

Congress News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर अडचणीत आलेल्या काँग्रेसला गेल्या दोन दिवसांत दोन मोठे झटके बसले आहेत. ज्येष्ठ नेते एके अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटनी गुरुवारी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनीही शुक्रवारी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किरण रेड्डी यांनी काँग्रेस हायकमांडच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

एखाद्या काँग्रेस नेत्याने पक्ष सोडताना हायकमांडवर प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राहुल गांधींवर गंभीर आरोप केले होते. आझाद यांची गणना गांधी घराण्याच्या जवळच्या व्यक्तींमध्ये होते. दरम्यान, गेल्या 9 वर्षात जवळपास 23 बडे नेते काँग्रेसमधून बाहेर गेले आहेत. विशेष म्हणजे या सर्व नेत्यांनी काँग्रेस सोडण्यास हायकमांडला जबाबदार धरले आहे. यात त्यांचा रोख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर होता.

कोणत्या नेत्याने कधी पक्ष सोडला?1. जगदंबिका पाल- 2014 

2. चौधरी बिरेंदर सिंग- ऑगस्ट 2014 

3. अजित जोगी- 2015

4. हिमंता बिस्वा सरमा- 2015

5. गिरीधर गमंग- 2015

6. एसएम कृष्णा- 2017 

7. शंकर सिंह वाघेला- 2017

8. एनडी तिवारी- 2017

9. विजय बहुगुणा- 2016

10. रिटा बहुगुणा जोशी- 2016

11. अशोक चौधरी- 2018 

12. नारायण राणे- 2016 

14. अल्पेश ठाकोर- 2018 

15. राधाकृष्ण विखे पाटील- 2019 

16. टॉम वडाक्कन- 2019

17. सतपाल महाराज- 2014 

18. अमरिंदर सिंग- 2022 

19. जितिन प्रसाद- 2021 

20. ज्योतिरादित्य सिंधिया- 2019 

21. आरपीएन सिंह- 2022

22. कपिल सिब्बल- 2020 

23. गुलाम नबी आझाद- 2022 

या 23 नेत्यांशिवाय इतर अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. यामध्ये प्रियांका चतुर्वेदी, हार्दिक पटेल, रिपुन बोरा, सुष्मिता देव, विश्वजित राणे, कीर्ती आझाद आणि ललितेश पती त्रिपाठी यांच्या नावांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्थलांतरामुळे आसाम, यूपी या राज्यांमध्ये काँग्रेस खूपच कमकुवत झाली आहे. सातत्याने नेत्यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसमधील हायकमांडवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या वर्षी उदयपूरमध्ये पक्षाने याबाबत चर्चा केली होती, मात्र या चर्चेनंतरही अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. हे थांबवण्यासाठी काँग्रेसने दोन मोठे निर्णय घेतल्याचे सांगितले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाPoliticsराजकारण