काँग्रेसमधील संघर्ष तूर्तास संपुष्टात

By Admin | Updated: September 6, 2014 01:46 IST2014-09-06T01:46:22+5:302014-09-06T01:46:22+5:30

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी दोन वेगवेगळी पत्रे जारी केली आणि याबरोबरच पक्षात उफाळलेल्या संघर्षाला पूर्णविराम लागला.

The conflict in Congress ends sooner | काँग्रेसमधील संघर्ष तूर्तास संपुष्टात

काँग्रेसमधील संघर्ष तूर्तास संपुष्टात

शीलेश शर्मा - नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी दोन वेगवेगळी पत्रे जारी केली आणि याबरोबरच पक्षात नव्या आणि जुन्या पिढी दरम्यान उफाळलेल्या संघर्षाला पूर्णविराम लागला. कोणताही नेता सार्वजनिक मंचावरून अथवा मीडियाच्या माध्यमातून पक्षाला हानी पोहोचेल, अशाप्रकारची कोणतीही सूचना देणार नाही वा टिप्पणी करणार नाही, अशी ताकीद या दोन्ही पत्रतून देण्यात आली आहे.राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ एकजूट होऊन वरिष्ठ नेत्यांवर खुर्ची सोडण्यासाठी दबाव आणणा:या सर्व सचिवांवरही हे र्निबध घालण्यात आले आहेत, हे विशेष. राहुल गांधी समर्थकांच्या या मोहिमेतील हवा काढण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या ‘व्हिटो पावर’चा मोठय़ा चतुराईने वापर केला आहे. 
द्विवेदी यांनी जारी केलेले पहिले पत्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांविरुद्ध बिगुल फुंकून संघर्षाची सुरुवात करणा:या सर्व सचिवांच्या नावाने आहे. तर दुसरे पत्र सर्व सरचिटणीस, प्रदेश अध्यक्ष, कार्य समिती सदस्य, आघाडय़ांचे अध्यक्ष आणि काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेत्यांच्या नावे जारी केले आहे. 
या दोन्ही पत्रत व्यर्थ व अनावश्यक वक्तव्य करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. आपले मत मीडियामार्फत व्यक्त करू नका, असा सल्ला सचिवांना देण्यात आला आहे. पक्ष सचिवांनी  द्विवेदी आणि दिग्विजयसिंग यांना याआधी पाठविलेल्या पत्रची प्रतही या पत्रसोबत जोडण्यात आली आहे, हे विशेष.द्विवेदींच्या या पत्रंमुळे काँग्रेसमध्ये उफाळलेला संघर्ष तात्पुरता शमला असल्याचे भासत असले तरी पक्ष संघटनेत युवा आणि वरिष्ठ नेत्यांमधील हा ‘जनरेशन गॅप’चा संघर्ष एवढय़ा सहजतेने थांबणार 
नाही, असे पक्षाच्या सूत्रंनी म्हटले आहे. काँग्रेसला नवसंजीवनी आणि नवे स्वरूप देण्यासाठी युवा नेत्यांना पक्षाच्या महत्त्वपूर्ण पदांवर नियुक्त केले पाहिजे. कारण जुन्या नेत्यांसोबत त्यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे आपल्या वयाच्या नेत्यांचीच संपूर्ण टीम तयार करण्याची राहुल गांधी यांची इच्छा आहे.

 

Web Title: The conflict in Congress ends sooner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.