शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

Coronavirus:…तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची परिस्थिती सांगणं कठीण; तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 07:28 IST

केरळमध्ये दुसऱ्या राज्यांप्रमाणे निर्बंधाचा भार होता. याठिकाणी वारंवार लोक निर्बंध हटवण्याची मागणी करत होते.

ठळक मुद्देरोगप्रतिकारशक्तीची कमतरता, निर्बंधांमध्ये सूट या गोष्टी संक्रमण वाढीसाठी प्रमुख कारण असू शकतात. केरळमध्ये ओणम उत्सव पूर्वीसारखा साजरा केला जाऊ शकत नाही. जर स्थिती जास्त बदलली नाही तर तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक नसेल

नवी दिल्ली – देशात बऱ्याच राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट शांत झाली आहे. तर केरळ आणि महाराष्ट्रात आजही देशातील सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये दिवसाला २० हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. राज्यात संक्रमण वाढत असल्यानं विजयन सरकारवर अनेक स्तरातून टीका होत आहे. परंतु देशातील टॉप वायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप यांनी संक्रमणासाठी राज्यावर टीका करणं योग्य नाही असं म्हटलं आहे.

डॉ. गगनदीप म्हणाले की, रुग्णसंख्या वाढल्याने राज्याला जबाबदार धरणं योग्य नाही. परंतु राज्यात कमी लसीकरण दर, लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्तीची कमतरता, निर्बंधांमध्ये सूट या गोष्टी संक्रमण वाढीसाठी प्रमुख कारण असू शकतात. केरळमध्ये दुसऱ्या राज्यांप्रमाणे निर्बंधाचा भार होता. याठिकाणी वारंवार लोक निर्बंध हटवण्याची मागणी करत होते. परंतु निर्बंधांमध्ये सूट देण्याची ही वेळ नाही. केरळमध्ये ओणम उत्सव पूर्वीसारखा साजरा केला जाऊ शकत नाही. आता लोकांना सतर्क राहणं गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच केरळमध्ये एक वेळ कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली होती परंतु कोरोना लसींच्या अभावी पुन्हा यात वाढ झाली. लसींचा पुरवठा करण्याबाबतही मजबुरी आहे. जनतेमध्ये अँन्टिबॉडी कमी पाहायला मिळत आहेत. आयसीएमआरच्या चौथ्या सीरो सर्व्हेनुसार, ४४.५ टक्के लोकांमध्ये अँन्टिबॉडी आहेत. कुठल्याही महामारीचा अंदाज जाहीर करू शकत नाही. जर व्हायरसचं आणखी म्यूटेशन झालं तर तो कितपत धोकादायक ठरेल हे सांगणं कठीण आहे. परंतु जर स्थिती जास्त बदलली नाही तर तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक नसेल असंही डॉक्टर गगनदीप कांग यांनी म्हटलं आहे.

आता शाळा उघडण्याची वेळ

शाळा उघडण्याची ही योग्य वेळ आहे. परंतु कोणीही संक्रमित झाला तर तातडीने त्याचे विलगीकरण झालं पाहिजे. त्याशिवाय कर्मचारी, शिक्षक यांचे लसीकरण केले जावे. ज्या मुलांना यापूर्वीच एखादा आजार असेल तर त्यांची ओळख पटवावी आणि लसीकरणात अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावं. जर संक्रमण जास्त वाढलं तर आपल्याला शाळा बंद करण्याची तयारी दाखवली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकता येत नाही अशा विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या