शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Coronavirus:…तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची परिस्थिती सांगणं कठीण; तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 07:28 IST

केरळमध्ये दुसऱ्या राज्यांप्रमाणे निर्बंधाचा भार होता. याठिकाणी वारंवार लोक निर्बंध हटवण्याची मागणी करत होते.

ठळक मुद्देरोगप्रतिकारशक्तीची कमतरता, निर्बंधांमध्ये सूट या गोष्टी संक्रमण वाढीसाठी प्रमुख कारण असू शकतात. केरळमध्ये ओणम उत्सव पूर्वीसारखा साजरा केला जाऊ शकत नाही. जर स्थिती जास्त बदलली नाही तर तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक नसेल

नवी दिल्ली – देशात बऱ्याच राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट शांत झाली आहे. तर केरळ आणि महाराष्ट्रात आजही देशातील सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये दिवसाला २० हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. राज्यात संक्रमण वाढत असल्यानं विजयन सरकारवर अनेक स्तरातून टीका होत आहे. परंतु देशातील टॉप वायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप यांनी संक्रमणासाठी राज्यावर टीका करणं योग्य नाही असं म्हटलं आहे.

डॉ. गगनदीप म्हणाले की, रुग्णसंख्या वाढल्याने राज्याला जबाबदार धरणं योग्य नाही. परंतु राज्यात कमी लसीकरण दर, लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्तीची कमतरता, निर्बंधांमध्ये सूट या गोष्टी संक्रमण वाढीसाठी प्रमुख कारण असू शकतात. केरळमध्ये दुसऱ्या राज्यांप्रमाणे निर्बंधाचा भार होता. याठिकाणी वारंवार लोक निर्बंध हटवण्याची मागणी करत होते. परंतु निर्बंधांमध्ये सूट देण्याची ही वेळ नाही. केरळमध्ये ओणम उत्सव पूर्वीसारखा साजरा केला जाऊ शकत नाही. आता लोकांना सतर्क राहणं गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच केरळमध्ये एक वेळ कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली होती परंतु कोरोना लसींच्या अभावी पुन्हा यात वाढ झाली. लसींचा पुरवठा करण्याबाबतही मजबुरी आहे. जनतेमध्ये अँन्टिबॉडी कमी पाहायला मिळत आहेत. आयसीएमआरच्या चौथ्या सीरो सर्व्हेनुसार, ४४.५ टक्के लोकांमध्ये अँन्टिबॉडी आहेत. कुठल्याही महामारीचा अंदाज जाहीर करू शकत नाही. जर व्हायरसचं आणखी म्यूटेशन झालं तर तो कितपत धोकादायक ठरेल हे सांगणं कठीण आहे. परंतु जर स्थिती जास्त बदलली नाही तर तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक नसेल असंही डॉक्टर गगनदीप कांग यांनी म्हटलं आहे.

आता शाळा उघडण्याची वेळ

शाळा उघडण्याची ही योग्य वेळ आहे. परंतु कोणीही संक्रमित झाला तर तातडीने त्याचे विलगीकरण झालं पाहिजे. त्याशिवाय कर्मचारी, शिक्षक यांचे लसीकरण केले जावे. ज्या मुलांना यापूर्वीच एखादा आजार असेल तर त्यांची ओळख पटवावी आणि लसीकरणात अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावं. जर संक्रमण जास्त वाढलं तर आपल्याला शाळा बंद करण्याची तयारी दाखवली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकता येत नाही अशा विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या