शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus:…तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची परिस्थिती सांगणं कठीण; तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 07:28 IST

केरळमध्ये दुसऱ्या राज्यांप्रमाणे निर्बंधाचा भार होता. याठिकाणी वारंवार लोक निर्बंध हटवण्याची मागणी करत होते.

ठळक मुद्देरोगप्रतिकारशक्तीची कमतरता, निर्बंधांमध्ये सूट या गोष्टी संक्रमण वाढीसाठी प्रमुख कारण असू शकतात. केरळमध्ये ओणम उत्सव पूर्वीसारखा साजरा केला जाऊ शकत नाही. जर स्थिती जास्त बदलली नाही तर तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक नसेल

नवी दिल्ली – देशात बऱ्याच राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट शांत झाली आहे. तर केरळ आणि महाराष्ट्रात आजही देशातील सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये दिवसाला २० हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. राज्यात संक्रमण वाढत असल्यानं विजयन सरकारवर अनेक स्तरातून टीका होत आहे. परंतु देशातील टॉप वायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप यांनी संक्रमणासाठी राज्यावर टीका करणं योग्य नाही असं म्हटलं आहे.

डॉ. गगनदीप म्हणाले की, रुग्णसंख्या वाढल्याने राज्याला जबाबदार धरणं योग्य नाही. परंतु राज्यात कमी लसीकरण दर, लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्तीची कमतरता, निर्बंधांमध्ये सूट या गोष्टी संक्रमण वाढीसाठी प्रमुख कारण असू शकतात. केरळमध्ये दुसऱ्या राज्यांप्रमाणे निर्बंधाचा भार होता. याठिकाणी वारंवार लोक निर्बंध हटवण्याची मागणी करत होते. परंतु निर्बंधांमध्ये सूट देण्याची ही वेळ नाही. केरळमध्ये ओणम उत्सव पूर्वीसारखा साजरा केला जाऊ शकत नाही. आता लोकांना सतर्क राहणं गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच केरळमध्ये एक वेळ कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली होती परंतु कोरोना लसींच्या अभावी पुन्हा यात वाढ झाली. लसींचा पुरवठा करण्याबाबतही मजबुरी आहे. जनतेमध्ये अँन्टिबॉडी कमी पाहायला मिळत आहेत. आयसीएमआरच्या चौथ्या सीरो सर्व्हेनुसार, ४४.५ टक्के लोकांमध्ये अँन्टिबॉडी आहेत. कुठल्याही महामारीचा अंदाज जाहीर करू शकत नाही. जर व्हायरसचं आणखी म्यूटेशन झालं तर तो कितपत धोकादायक ठरेल हे सांगणं कठीण आहे. परंतु जर स्थिती जास्त बदलली नाही तर तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक नसेल असंही डॉक्टर गगनदीप कांग यांनी म्हटलं आहे.

आता शाळा उघडण्याची वेळ

शाळा उघडण्याची ही योग्य वेळ आहे. परंतु कोणीही संक्रमित झाला तर तातडीने त्याचे विलगीकरण झालं पाहिजे. त्याशिवाय कर्मचारी, शिक्षक यांचे लसीकरण केले जावे. ज्या मुलांना यापूर्वीच एखादा आजार असेल तर त्यांची ओळख पटवावी आणि लसीकरणात अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावं. जर संक्रमण जास्त वाढलं तर आपल्याला शाळा बंद करण्याची तयारी दाखवली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकता येत नाही अशा विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या