शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बाबरी मशीद प्रकरणी खटल्याची सुनावणी ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा - सुप्रीम कोर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 20:05 IST

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने अयोध्या येथील 1992 साली बाबरी मशीद उध्वस्त केल्याप्रकरणी संबंधित खटल्यांची सुनावणी पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी ...

ठळक मुद्देबाबरी मशीद विध्वंस प्रकरणी खटल्याची सुनावणी ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन सुप्रीम कोर्टाने दिली आहे. सुप्रीम कोर्टाने बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्या. एस के यादव यांना सांगितले आहे की, 31 ऑगस्टपर्यंत खटल्याची सुनावणी पूर्ण करा.

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने अयोध्या येथील 1992 साली बाबरी मशीद उध्वस्त केल्याप्रकरणी संबंधित खटल्यांची सुनावणी पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी विशेष कोर्टाला तीन महिने वाढवून देण्यात आले आहेत. कार्यवाही तीन महिन्यांपूर्वी केली. बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी खटल्याची सुनावणी ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन सुप्रीम कोर्टाने दिली आहे.

 

सुप्रीम कोर्टाने बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्या. एस के यादव यांना सांगितले आहे की, 31 ऑगस्टपर्यंत खटल्याची सुनावणी पूर्ण करा. याआधी विशेष न्यायधीशांना 30 एप्रिलपर्यंत खटला पूर्ण करण्यास सांगितलं होतं. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेत्यांविरुद्ध हा खटला सुरू आहे. सुप्रीम कोर्टाचे न्या. रोहिंटन नरिमन यांच्या खंडपीठाने विशेष न्यायाधीशांना सांगितले की, या प्रकरणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवू शकतात आणि 31 ऑगस्टला सुनावणी पूर्ण होईल याबाबत खात्री करा.

विशेष न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाला पत्र लिहून सुनावणी पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही मुदत चार महिन्यांसाठी वाढविली आहे आणि 31 ऑगस्टपर्यंत सुनावणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे कोर्टाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 19 जुलै रोजी सहा महिन्यांत साक्ष नोंदविण्यात यावे, असा आदेश दिला होता. तथापि, अद्याप साक्ष  नोंदवलेली नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदविण्यात यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 19 एप्रिल 2017 रोजी आपल्या आदेशात म्हटले आहे की, विशेष न्यायाधीशांनी या खटल्याची सुनावणी दोन वर्षांत पूर्ण करावी आणि न्यायाधीशांची बदली करण्यात येऊ नये.काय प्रकरण आहे?6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली. कल्याण सिंह त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मिळालेल्या माहितीनुसार, बाबरी मशीद पाडण्यापूर्वी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले की, बाबरी मशीद नुकसान होऊ देणार नाही. मात्र ते अपयशी ठरले. 

 

...अन् बाबरी मशीद पडली!; कधी-काय-कसं घडलं..

 

'17 मिनिटांत बाबरी मशीद पाडली, मग राम मंदिरासाठी कायदा करण्यास इतका वेळ का?'

 

अयोध्येत बाबरी मशीद बांधण्याची मागणी

 

Ayodhya Verdict: बाबरी मशीद रिकाम्या जागेवर बांधली गेली नव्हतीः सुप्रीम कोर्ट

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMosqueमशिदLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीCourtन्यायालय