शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

बाबरी मशीद प्रकरणी खटल्याची सुनावणी ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा - सुप्रीम कोर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 20:05 IST

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने अयोध्या येथील 1992 साली बाबरी मशीद उध्वस्त केल्याप्रकरणी संबंधित खटल्यांची सुनावणी पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी ...

ठळक मुद्देबाबरी मशीद विध्वंस प्रकरणी खटल्याची सुनावणी ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन सुप्रीम कोर्टाने दिली आहे. सुप्रीम कोर्टाने बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्या. एस के यादव यांना सांगितले आहे की, 31 ऑगस्टपर्यंत खटल्याची सुनावणी पूर्ण करा.

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने अयोध्या येथील 1992 साली बाबरी मशीद उध्वस्त केल्याप्रकरणी संबंधित खटल्यांची सुनावणी पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी विशेष कोर्टाला तीन महिने वाढवून देण्यात आले आहेत. कार्यवाही तीन महिन्यांपूर्वी केली. बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी खटल्याची सुनावणी ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन सुप्रीम कोर्टाने दिली आहे.

 

सुप्रीम कोर्टाने बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्या. एस के यादव यांना सांगितले आहे की, 31 ऑगस्टपर्यंत खटल्याची सुनावणी पूर्ण करा. याआधी विशेष न्यायधीशांना 30 एप्रिलपर्यंत खटला पूर्ण करण्यास सांगितलं होतं. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेत्यांविरुद्ध हा खटला सुरू आहे. सुप्रीम कोर्टाचे न्या. रोहिंटन नरिमन यांच्या खंडपीठाने विशेष न्यायाधीशांना सांगितले की, या प्रकरणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवू शकतात आणि 31 ऑगस्टला सुनावणी पूर्ण होईल याबाबत खात्री करा.

विशेष न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाला पत्र लिहून सुनावणी पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही मुदत चार महिन्यांसाठी वाढविली आहे आणि 31 ऑगस्टपर्यंत सुनावणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे कोर्टाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 19 जुलै रोजी सहा महिन्यांत साक्ष नोंदविण्यात यावे, असा आदेश दिला होता. तथापि, अद्याप साक्ष  नोंदवलेली नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदविण्यात यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 19 एप्रिल 2017 रोजी आपल्या आदेशात म्हटले आहे की, विशेष न्यायाधीशांनी या खटल्याची सुनावणी दोन वर्षांत पूर्ण करावी आणि न्यायाधीशांची बदली करण्यात येऊ नये.काय प्रकरण आहे?6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली. कल्याण सिंह त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मिळालेल्या माहितीनुसार, बाबरी मशीद पाडण्यापूर्वी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले की, बाबरी मशीद नुकसान होऊ देणार नाही. मात्र ते अपयशी ठरले. 

 

...अन् बाबरी मशीद पडली!; कधी-काय-कसं घडलं..

 

'17 मिनिटांत बाबरी मशीद पाडली, मग राम मंदिरासाठी कायदा करण्यास इतका वेळ का?'

 

अयोध्येत बाबरी मशीद बांधण्याची मागणी

 

Ayodhya Verdict: बाबरी मशीद रिकाम्या जागेवर बांधली गेली नव्हतीः सुप्रीम कोर्ट

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMosqueमशिदLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीCourtन्यायालय