शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामीप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 07:00 IST

याबाबत पुराव्यांसह स्पष्टीकरण देऊनही काँग्रेसकडून सावरकरांची बदनामी केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत बदनामीकारक वक्तव्ये करत आहेत. नुकतेच छत्तीसगड येथील जगदलपूर येथे जाहीर सभेत त्यांनी पुन्हा एकदा सावरकरांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची हात जोडून माफी मागितली,’ असे वक्तव्य करून राहुल गांधी यांनी एका थोर क्रांतिकारकाचा अवमान केला आहे. त्यांच्या वक्तव्याने देशभक्त जनतेची मने दुखावली आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात त्वरित कारवाई करावी, अशी मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे. सावरकरांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. आपलीच नव्हे तर, अन्य क्रांतिकारकांचीही सुटका व्हावी यासाठी अर्ज केले. कारागृहातून कुठल्याही प्रकारे सुटका करून घेऊन आपले कार्य चालू ठेवणे, ही सर्वच क्रांतिकारकांची रणनीती होती. सावरकरांप्रमाणेच सर्वांनीच सरकारी अटी मान्य करून सुटका करून घेतली व पुढे काम सुरू ठेवले, असे रणजीत सावरकर यांच्या तक्रारीत नमूद आहे.

याबाबत पुराव्यांसह स्पष्टीकरण देऊनही काँग्रेसकडून सावरकरांची बदनामी केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले. सावरकर अंदमानात असतानाच त्यांचा युरोपमधील क्रांतिकारकांशी संपर्क असल्याचा ब्रिटिश गुप्तचर खात्याचा अहवाल आहे. तत्कालीन गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी सावरकरांच्या अर्जात खेद अथवा खंत नसल्याचे नोंदवत सावरकर अत्यंत धोकादायक कैदी असल्यामुळे त्यांना अंदमानात डांबून ठेवणे भाग असल्याचे म्हटले आहे. त्याप्रमाणे ब्रिटिशांनी सावरकरांना एकूण १४ वर्षे कारागृहात आणि नंतर १३ वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. असे असतानाही राहुल गांधी यांनी जाणीवपूर्वक ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची हात जोडून माफी मागितली,’ असे विधान करून त्यांचा अपमान केला आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणPoliceपोलिस