शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपची पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 17:38 IST

भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे की, केजरीवाल आणि सिसोदिया यांना ठार मारण्याचा खोटा आरोप माझ्यावर केला जात आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या टप्यात हि राजकरण तापतांना दिसत आहे. भाजपकडून माझी हत्या होऊ शकते असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता . याप्रकरणी भाजपकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.  भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

पंतप्रधान इंदिरा गांधींप्रमाणे माझे सुरक्षारक्षक मला ठार मारतील असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला होता. सुरक्षारक्षकांच्यामदतीने भाजप माझी हत्या करण्याचा कट रचत असल्याचा आरोप सुद्धा केजरीवाल यांनी केला होता. भाजपने केजरीवाल यांच्या आरोपावर आक्षेप घेतला असून अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध थेट पोलिसात धाव घेतली आहे.

भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे की, केजरीवाल आणि सिसोदिया यांना ठार मारण्याचा खोटा आरोप माझ्यावर केला जात आहे. उलट माझ्या जीवाला यांच्यापासून धोका आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी याची दखल घेत चौकशी करावी अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.

पंजाब मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान माध्यमांशी बोलताना, केजरीवाल यांनी भाजपवर आपली हत्या करण्याचे प्रयत्न करत असल्याचे आरोप लावले होते. आतापर्यंत आपल्यावर ५ वेळा हल्ला झाला आहे. मी केलेला विकास त्यांना पचत नाही, त्यामुळेच भाजप मला संपवणार असा दावा त्यांनी केला होता. याप्रकरणी विजेंद्र गुप्ता यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळंच वळण प्राप्त झालं आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019