शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना; भाजपा नेत्याने दिली 'छत्रपती' उपमा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 16:36 IST

मागील काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाला झटका मिळालेला असतानाही भाजपाच्या उपाध्यक्षा उमा भारती यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करताना नव्या वादाला तोंड फोडलं आहे. मोदींशिवाय भाजपामध्ये कोणताही सक्षम नेता नाही, सर्व लोकांना फक्त मोदी हवे आहेत. असं सांगत  नरेंद्र मोदी यांना छत्रपती मोदी जिंदाबाद असं म्हणल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मागील काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. आज के शिवाजी नरेंद्र मोदी नावाने भाजपा नेते जयभगवान गोयल यांनी पुस्तक प्रकाशित केले होते. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीची लाट उसळली होती. अनेकांनी या पुस्तकावर नाराजी व्यक्त करत भाजपाविरोधात संताप व्यक्त केला होता. 

छत्रपती ही पदवी शिवाजी महाराजांना राज्याभिषेकानंतर रयतेने दिली होती. शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र मोदींची तुलना होण्यावरुन शिवप्रेमी संतप्त होते. त्यात उमा भारती यांनी छत्रपती मोदी असा उल्लेख केल्याने महाराष्ट्रात या विषयी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिल्ली निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उमा भारती यांनी ट्विट केलं आहे त्यात म्हटलंय की, जवळपास दीड वर्षापासून देशातील विविध राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका, त्यानंतर लोकसभा निकाल, अलीकडेच काही राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागले त्यातून हे स्पष्ट होते की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा सक्षम नेता नाही. संपूर्ण देशाने मोदींना आत्मसात केलं आहे. छत्रपती मोदी जिंदाबाद असं कौतुक करण्यात आलं आहे. 

उमा भारतींच्या या ट्विटवर काही नेटकऱ्यांनी आक्षेप घेत छत्रपती ही पदवी मोदींना शोभून दिसते का? असा सवाल केलाय, तसेच छत्रपती शिवरायांनी जितके कार्य केले, त्याच्या कणभरही काम करुन दाखवा असा सल्ला देण्यात आला आहे. 

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीनं मुसंडी मारली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार येण्याची दाट शक्यता आहे. आम आदमी पार्टीने 63हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. तर भारतीय जनता पार्टी 7 जागांवर पुढे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत केजरीवाल सरकार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर काँग्रेसला या निवडणुकीत यश मिळवता आले नाही. सध्या काँग्रेसला एकाही मतदारसंघात आघाडी नाही. त्यामुळे यंदाही काँग्रेस भोपळा फोडण्याची शक्यता कमीच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

किमान शब्दांत कमाल टीका; पुण्यात शरद पवारांकडून राज ठाकरेंचा समाचार

भाजपाने द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला - मनीष सिसोदिया

गोळी मारणाऱ्यांना 'झाडू'ने मारलं, निकालानंतर प्रकाश राजची सिंघम स्टाईल टीका

'दिल्लीच्या जनतेने भाजपाला नाकारलं; सीएए, एनआरसी, एनपीआरलाही नाकारतील'

भाजपाच्या पराभवाचा सिलसिला आता थांबेल असं वाटत नाही; शरद पवारांची चपराक

 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNarendra Modiनरेंद्र मोदीUma Bhartiउमा भारतीdelhi electionदिल्ली निवडणूक