शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना; भाजपा नेत्याने दिली 'छत्रपती' उपमा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 16:36 IST

मागील काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाला झटका मिळालेला असतानाही भाजपाच्या उपाध्यक्षा उमा भारती यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करताना नव्या वादाला तोंड फोडलं आहे. मोदींशिवाय भाजपामध्ये कोणताही सक्षम नेता नाही, सर्व लोकांना फक्त मोदी हवे आहेत. असं सांगत  नरेंद्र मोदी यांना छत्रपती मोदी जिंदाबाद असं म्हणल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मागील काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. आज के शिवाजी नरेंद्र मोदी नावाने भाजपा नेते जयभगवान गोयल यांनी पुस्तक प्रकाशित केले होते. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीची लाट उसळली होती. अनेकांनी या पुस्तकावर नाराजी व्यक्त करत भाजपाविरोधात संताप व्यक्त केला होता. 

छत्रपती ही पदवी शिवाजी महाराजांना राज्याभिषेकानंतर रयतेने दिली होती. शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र मोदींची तुलना होण्यावरुन शिवप्रेमी संतप्त होते. त्यात उमा भारती यांनी छत्रपती मोदी असा उल्लेख केल्याने महाराष्ट्रात या विषयी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिल्ली निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उमा भारती यांनी ट्विट केलं आहे त्यात म्हटलंय की, जवळपास दीड वर्षापासून देशातील विविध राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका, त्यानंतर लोकसभा निकाल, अलीकडेच काही राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागले त्यातून हे स्पष्ट होते की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा सक्षम नेता नाही. संपूर्ण देशाने मोदींना आत्मसात केलं आहे. छत्रपती मोदी जिंदाबाद असं कौतुक करण्यात आलं आहे. 

उमा भारतींच्या या ट्विटवर काही नेटकऱ्यांनी आक्षेप घेत छत्रपती ही पदवी मोदींना शोभून दिसते का? असा सवाल केलाय, तसेच छत्रपती शिवरायांनी जितके कार्य केले, त्याच्या कणभरही काम करुन दाखवा असा सल्ला देण्यात आला आहे. 

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीनं मुसंडी मारली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार येण्याची दाट शक्यता आहे. आम आदमी पार्टीने 63हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. तर भारतीय जनता पार्टी 7 जागांवर पुढे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत केजरीवाल सरकार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर काँग्रेसला या निवडणुकीत यश मिळवता आले नाही. सध्या काँग्रेसला एकाही मतदारसंघात आघाडी नाही. त्यामुळे यंदाही काँग्रेस भोपळा फोडण्याची शक्यता कमीच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

किमान शब्दांत कमाल टीका; पुण्यात शरद पवारांकडून राज ठाकरेंचा समाचार

भाजपाने द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला - मनीष सिसोदिया

गोळी मारणाऱ्यांना 'झाडू'ने मारलं, निकालानंतर प्रकाश राजची सिंघम स्टाईल टीका

'दिल्लीच्या जनतेने भाजपाला नाकारलं; सीएए, एनआरसी, एनपीआरलाही नाकारतील'

भाजपाच्या पराभवाचा सिलसिला आता थांबेल असं वाटत नाही; शरद पवारांची चपराक

 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNarendra Modiनरेंद्र मोदीUma Bhartiउमा भारतीdelhi electionदिल्ली निवडणूक