शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

"कंपनीचा फायदा २७ कोटी, पण ४०० कोटी दिले"; तरीही MIM बी टीम ?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 18:03 IST

असदुद्दीन औवेसी यांनी इलेक्ट्रोरोल बाँड्सच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळालेल्या रकमेची माहिती जाहीर सभेतून दिली

हैदराबाद - सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोरोल बाँड कायदा हा बेकायदेशीर असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे उल्लंघन असल्याचे म्हटले. त्यामुळे, मोदी सरकारने केलेला इलेक्ट्रोल बाँड्सचा कायदा रद्द करण्यात आला आहे. त्याशिवाय आजपर्यंत राजकीय पक्षांना इलेक्ट्रोरोल बाँड्सच्या माध्यमातून मिळालेल्या निधीची आकडेवारीही जाहीर करण्यास सांगितले. त्यानुसार, आता एसबीआयकडून इलेक्ट्रोरोल बाँड्स व ज्या राजकीय पक्षांना हे बाँड्स दिले, त्या कंपन्यांची नावे व रक्कम उघड झाली आहे. त्यामध्ये, जवळपास प्रमुख राजकीय पक्षांना काही ना काही प्रमाणात हे बाँड्स मिळाले आहेत. मात्र, असदुद्दीने औवेसी यांच्या एमआयएम पक्षाला एकही बाँड्स मिळाला नसल्याचं खासदार औवेसी यांनी म्हटलं आहे. 

असदुद्दीन औवेसी यांनी इलेक्ट्रोरोल बाँड्सच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळालेल्या रकमेची माहिती जाहीर सभेतून दिली. यावेळी, भाजपाला तब्बल ६ हजार कोटी रुपये इलेक्ट्रोरोल बाँड्सच्या माध्यमातून मिळाले असून ममता बॅनर्जींच्या टीएमसीला १६१० कोटी, काँग्रेसला १४२२ कोटी रुपये, यांसह इतर राजकीय पक्षांना मिळालेल्या रकमेची माहिती औवेसी यांनी सभेतून बोलताना दिली. विशेष म्हणेज एका लॉटरी कंपनीने तब्बल १३०० कोटी रुपयांचे बाँड्स घेऊन या राजकीय पक्षांना दिले. तर, काही औषध निर्माता कंपन्यांनीही जवळपास ६०० कोटी रुपये दिले. विशेष म्हणजे या कंपन्यांपैकी एका कंपनीला नफा २७ कोटींचा झालेला आहे, पण या कंपनीने तब्बल ४०० कोटींचे बाँड्स राजकीय पक्षांना दिले. जर, २७ कोटी कंपनीचा नफा असेल तर ४०० कोटी कुठून आले?, असा सवाल असदुद्दीन औवेसी यांनी उपस्थित केला आहे. तसेच, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना कोट्यवधींची देणगी मिळाली. पण, एमआयएम पक्षाला एकही बाँड मिळाला नसून एक रुपयाचीही देणगी देण्यात आली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

एमआयएम पक्षाला एकही बाँड देण्यात आला नाही. इतर सर्वच राजकीय पक्षांना कोट्यवधी रुपयांचा निधी या बाँड्सच्या माध्यमातून मिळाला आहे. तरीही एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे, असं म्हणतात, असे म्हणत असदुद्दीन औवेसी यांनी इलेक्ट्रोरोल बाँडसवर भाष्य केलं आहे. 

काळ्या यादीतील कंपनीने ९४० कोटी दिले - आव्हाड

मेघा इंजिनिअरींग या कंपनीला बोरीवली ते ठाणे हा डोंगराच्या आतून रस्ता काढण्याचे काँट्रॅक्ट देण्यात आले. १४ हजार ४०० कोटी रूपयांची किंमत या काँट्रॅक्टची होती. त्याबदल्यात मेघा इंजिनिअरींगने ९४० कोटी रूपयांचे इलेक्ट्रोल बाँड विकत घेतले. भ्रष्टाचाराचा हा सोपा मार्ग झाला आहे. कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असेल तर बाँड विकत घ्या, हे सरळ गणित या सरकारने मांडलं. बोरीवली ते ठाणे या रस्त्याच्या एका किलोमीटरची किंमत ही जगात कोणीही देत नसेल एवढी आहे. जणू काही या रस्त्याला सोन्याचा मुलामाच लावणार आहेत, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.  

दरम्यान, इलेक्ट्रोरोल बाँडच्या माध्यमातून अब्जाधींचा निधी राजकीय पक्षांना मिळाला असून त्यामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात आघाडीवर आहे. भाजपाला ६ हजार ६० कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मिळाला असून काँग्रेसला ३१४६ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. आता, या इलेक्ट्रोरोल बाँडच्या निधीवरुन विरोधकांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय