शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कंपन्यांना कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचंही लसीकरण करता येणार; सरकारकडून ‘तो’ निर्णय मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 17:57 IST

Coronavirus Vaccine : यापूर्वी कंपन्यांनी केवळ कर्मचाऱ्यांचंच लसीकरण करण्याचे दिले होते निर्देश. कंपन्यांकडून व्यक्त करण्यात आली होती नाराजी.

ठळक मुद्देयापूर्वी कंपन्यांनी केवळ कर्मचाऱ्यांचंच लसीकरण करण्याचे दिले होते निर्देश.कंपन्यांकडून व्यक्त करण्यात आली होती नाराजी.

सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांचंच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांचं आणि त्यांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यानंतर या निर्णयात काही बदल करत कंपन्यांना केवळ आपल्या कर्मचाऱ्यांचंच लसीकरण करता येणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. तसंच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं कंपन्या लसीकरण करू शकणार नाहीत असे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रातून या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. परंतु आता सरकारनं हा निर्णय मागे घेतला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निर्णयावर अनेक कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मर्यादा केवळ कर्मचाऱ्यांनाच लागू होणार नाही, अशी अॅडव्हायझरी सरकारकडून शुक्रवारी राज्यांना देण्यात आली. शनिवारी ही नवी अॅडव्हायझरी सर्व कंपन्यांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यापूर्वीच्या निर्णयामुळे लसीकरण प्रक्रियेचा वेग मंदावेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. शुक्रवारच्या पत्रामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की स्पष्टीकरणात अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली होती आणि ती कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी होती.सरकारच्या या निर्णयानंतर कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचं लसीकरण करता येणार आहे. यामध्ये कर्मचारी, त्यांची पती/पत्नी, त्यांची मुलं, आई-वडील, सासू-सासरे यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु कुटुंबीयांपैकी कोणाला लस द्यायची हे कंपनीच्या अंतर्गत धोरणांवरही अवलंबून आहे.  यापूर्वी काय घेण्यात आला होता निर्णय?आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं राज्य सरकारांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं लसीकरण करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानंतर अनेक कंपन्या आणि उद्योग संस्थांनी संभाव्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकारकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. याशिवाय उद्योग मंडळं तसंच कॉर्पोरेट संस्थांनी या नियमांबद्दल आपल्याला कल्पना नसल्याचं म्हटलं होतं. याशिवाय या पत्रात काही मार्गदर्शक सूचनांमध्ये बदलांचाही उल्लेख आहे, जे यापूर्वी स्पष्टपणे संकेतस्थळावर उपलब्ध नव्हते. यामुळेच काही कंपन्यांची सरकारकडे यासंदर्भात स्पष्टता आणण्याची मागणी केली होती. 

परिणाम जाणवण्याची व्यक्त केली होती भीती“जर हे लागू करण्यात आलं असतं तर लोकांना अन्य सेंटर्समध्ये अपॉईंटमेंट मिळाली असतं. परंतु आता १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मर्यांदेमध्ये हे अशक्य आहे,” असं एका कंपनीच्या अधिकाऱ्यानं नमूद केलं होतं. “बुधवारी झालेल्या चर्चेचा रुग्णालयांच्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या संबंधांवर परिणाम होणार नाही. परंतु लसीकरणाचे जे उपक्रम कार्यालयांमध्ये राबवण्यात येत आहेत त्यावर याचा परिणाम होईल,” असं सूत्रांनी सांगितलं होतं. छोटी गावं आणि शहरांमध्ये याचा परिणाम अधिक जाणवेल अशी शक्यता आहे. ज्या ठिकाणी रुग्णालयांची साखळी नाही अशा ठिकाणी काही कंपन्या लसीकरणाचे उपक्रम राबवत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतGovernmentसरकार