शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सांप्रदायिक दंगल: महाराष्ट्रात दोषसिद्धी १.२७ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 11:35 IST

देशभरातील प्रमाण ५.७० टक्के, उत्तर प्रदेश १७.२५ टक्केवारीने अग्रणी. २०२० मध्ये हरियाण, बिहार, महाराष्ट्रात सर्वाधिक सांप्रदायिक दंगली.

हरिश गुप्ता

नवी दिल्ली :  गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सांप्रदायिक दंगलीच्या खटल्यातील दोषसिद्धीचे प्रमाण अवघे १.२७ टक्के असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरातील या प्रकरणातील दोषसिद्धीचे प्रमाण  राष्ट्रीय सरासरी ५.७० टक्क्यांपेक्षाही महाराष्ट्रातील प्रमाण खूपच कमी आहे. अधिकृत सूत्रांकडून प्राप्त आकडेवारीनुसार ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांनी सांप्रदायिक दंगलीप्रकरणी १७२४४ व्यक्तींविरुद्ध आरोपपत्रे दाखल केली होती; परंतु, त्यापैकी ९८४ व्यक्तींना दोषी ठरविण्यात आले असून दोषसिद्धीचे प्रमाण ५.७० टक्के आहे.

महाराष्ट्रात २०१६ ते २०२० या पाच वर्षांत सांप्रदायिक दंगलीप्रकरणी २५११ जणांविरुद्ध आरोपपत्रे दाखल करण्यात आली होती. यापैकी फक्त ३२ लोकांनाच दोषसिद्ध ठरविण्यात यश आले.  २०१९ मध्ये महाराष्ट्रात सांप्रदायिक दंगलीप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या ७८० पैकी एकालाही दोषसिद्ध ठरविण्यात आले नाही. २०१८ आणि २०२० मध्येही सांप्रदायिक दंगलीचे सर्व आरोपी सुटले. २०१७ आणि २०१९ मध्येच बोटावर मोजण्याइतपत आरोपींना दोषी ठरविण्यात आले.

हरियाणा आणि बिहारमधील सांप्रदायिक दंगल प्रकरणातील दोषसिद्धीचे प्रमाणही निराशाजनक आहे.  २०१६ ते २०२० या पाच वर्षांत दोन्ही राज्यांत अनुक्रमे १९ आणि  ८४ व्यक्तींना दोषी ठरविण्यात आले. तथापि, उत्तर प्रदेशातील स्थिती चांगली दिसते. गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशात सांप्रदायिक दंगलीच्या गुन्ह्याप्रकरणी ७०७ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आली होती; पैकी १२२ जणांना दोषी ठरविण्यात आले असून उत्तर प्रदेशात गेल्या पाच वर्षांतील दोषसिद्धीचे प्रमाण १७.२५ टक्के आहे.  २०२० मध्ये उत्तर प्रदेश, गोवा, कर्नाटक, पंजाब आणि  तेलंगणसह १९ राज्यांत एकही सांप्रदायिक दंगल घडली नाही. 

कोणत्या राज्यात किती दंगलीहरियाणा, बिहार आणि महाराष्ट्रात २०२० मध्ये  सर्वाधिक सांप्रदायिक दंगली घडल्या, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात  २०१८, २०१९ आणि  २०२० या तीन वर्षांत एकही सांप्रदायिक दंगल घडली नाही. गेल्या पाच वर्षांत बिहारमध्ये ७२१, महाराष्ट्रात २९५ आणि हरियाणात ४१२ सांप्रदायिक दंगलीच्या घटना घडल्या.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेश