शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Delhi Election: दिल्लीत आम आदमीचेच राज्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 08:12 IST

भाजपची मजल ८ जागांवर : काँग्रेसचा भोपळा कायम; ‘गोली मारो’च्या विखारी प्रचाराला मतदारांचे उत्तर

सुरेश भुसारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘गोली मारो’पासून सुरू झालेल्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देताना दिल्लीकरांनी विधानसभेच्या ७० पैकी ६२ जागांवर आम आदमी पक्षालाच विजयी केले. दुहेरी आकडा न गाठता येणाऱ्या भाजपला दुहेरी आठ ठिकाणी विजय मिळाला, तर काँग्रेसला यंदाही भोपळाही फोडता आला नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा नवी दिल्ली मतदारसंघातून १९ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. तेच तिसºयांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील.

मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर तासाभरताच दिल्लीत आपची सत्ता येण्यावर शिक्कामोर्तब झाले. गेल्या २२ वर्षांपासून दिल्लीत सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजप नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेला यंदाही सुरूंग लागला आहे. गेल्या महिनाभराच्या विखारी प्रचारामुळे दिल्लीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते. या प्रचाराला केजरीवाल यांनी अत्यंत संयत उत्तर दिल्याने मतदारांचा विश्वास जिंकण्यात अखेर आपचे उमेदवार यशस्वी ठरले.

दिल्लीत ८ फेब्रुवारीला मतदान संपल्यानंतर लगेचच एक्झिट पोलमधून ‘आप’ला बहुमत मिळेल, असेच भाकित वर्तविण्यात आले होते. तसाच कौल जनतेने दिला. आपच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी, मंत्र्यांनी वर्चस्व कायम राखला. दिल्लीतील १२ जिल्ह्यांमधील केंद्रांवर मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीपासून आपच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी कायम राहिली. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घरात बसून निकाल पाहिले. यावेळी त्यांच्यासह त्यांचे रणनीतीकार प्रशांत किशोर हेही होते.

‘आप’लाच सत्ता मिळणार, हे स्पष्ट होताच कार्यालयात टोपीधारी कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवून व गुलाल उधळून आंनदोत्सव साजरा केला. दुपारनंतर या उत्साहात मुख्यमंत्री केजरीवालही सामील झाले होते. त्यांनी तिथे सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानलेच, पण एवढा मोठा जनादेश दिल्याबद्दल दिल्लीकर जनतेला उद्देशून ‘आय लव्ह यू’ असे उद्गारही काढले.गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा ५ टक्के कमी मतदान कमी झाले होते. याचा फटका कुणाला बसेल, याची चर्चा मतमोजणी सुरू होईस्तोवर चालली होती. पण टपालाने आलेल्या मतांमधूनही कौल आम आदमी पक्षाला आल्याचे स्पष्ट झाले. तरीही भाजपचे सारे नेते व दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी आम्हालाच बहुमत मिळेल, सुरुवातीचे कल बदलतील, असा विश्वास व्यक्त करीत होते. काँग्रेस नेत्यांना मात्र आपल्या पराभवाचा आधीच अंदाज आला होता. त्यामुळे त्या पक्षाचे नेते व कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाकडे वळलेच नाहीत.

वादग्रस्त विधानांचा फायदा झाल्याची चर्चाप्रचारात भाजपच्या नेत्यांनी वादग्रस्त विधाने केल्याने वातावरण तापले होते. केंद्रीय अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘गोली मारो...’ तर खासदार परवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले होते. या प्रचाराचा भाजपला फायदा मिळणार का, याची चर्चा सुरू होती.प्रचाराचा सारी धुरा गृहमंत्री अमित शहा यांच्यावर होती. त्यांनी जवळपास २०० प्रचार सभांद्वारे दिल्ली पिंजून काढली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्लीत दोन सभा घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे देशातील बहुतेक दिग्गज नेते दिल्लीत प्रचाराला आले होते.मात्र एवढ्या प्रचारानंतरही भाजपला ८ जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीत भाजपला ३ जागा मिळाल्या होत्या. आता त्यात ५ ची भर पडली.‘आप’ व केजरीवालांवरील अपेक्षांचे ओझे वाढलेनवी दिल्ली: शाहीन बाग आंदोलन, सीलमपूर भागांत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील मोर्चात झालेला किरकोळ हिंसाचार, निर्भयाच्या आरोपींना फाशी, जेएनयूतील कथित राष्ट्रविरोधी घोषणाप्रकरणी आरोपपत्र अशा असंख्य मुद्यांवर आम आदमी पक्षाने घेतलेली संदिग्ध भूमिकाच मतदारांनी स्वीकारली, असे निकालांतून दिसत आहे.आप अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करते, असे भाजप नेते बोलत होते. त्याचा फटका बसण्याची इतकी भीती अरविंद केजरीवाल यांना वाटली की त्यांनी हनुमान मंदिरच गाठले. त्यावरूनही राजकारण तापले. यंदाची निवडणूक स्थानिक विरूद्ध स्थलांतरित अशीही झाली.'मोफत'मुळे पडणारा आर्थिक खड्डा बुजवण्याची कसरत आपला करावी लागेल. यावरून भाजप भविष्यात जोदार टीका करण्याची शक्यता आहे. अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण व बहुसंख्यविरोधी या भाजपने ठसवलेल्या प्रतिमेतूनही आपला बाहेर यावे लागेल.

काँग्रेसचे पानिपतकाँग्रेसला तर ४ टक्के मतेच मिळाली आणि त्या पक्षाच्या ६३ उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली. काँग्रेसचे सर्व उमेदवार तिसºया क्रमांकावर होते. सरचिटणीस प्रियंका गांधी व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारांसाठी प्रचार केला, परंतु मतदारांनी या प्रचाराला गांभीर्याने घेतले नसल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीपेक्षा काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत १८ टक्क्यांनी घट झाली आहे.आपचे दिग्गज विजयीआपच्या प्रमुख विजयी उमेदवारांत अरविंद केजरीवाल यांच्यासह मनिष सिसोदिया, गोपाल राय, आतिशी, दिलीप पांडे, राघव चढ्ढा, राखी बिडला, सत्येंद्र जैन,शोएब इक्बाल, सौरभ भारद्वाज, अमानुतुल्ला खान, राजेंद्रपाल गौतम आदींचा समावेश आहे. आपच्या ८ पैकी ७ महिला उमेदवार यंदा विजयी झाल्या.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूकAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी