शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

लोकलला ग्लोबल करण्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे या; पंतप्रधान मोदींचं आवाहन

By जयदीप दाभोळकर | Updated: January 2, 2021 13:28 IST

PM Narendra Modi : शेतीपासून ते अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रांपर्यंत स्टार्टअपची व्याप्ती आता वाढत असल्याचं पंतप्रधानांचं मत

ठळक मुद्देआजचे स्टार्टअप्सचं उद्याच्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी बनतील, पंतप्रधानांचा विश्वासविद्यार्थ्यांनी लोकलला ग्लोबल करण्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे आलं पाहिजे.

कोरोना महासाथीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना 'लोकलसाठी व्होकल' होण्याचं आवाहन केलं होतं. तसंच आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे असंही ते म्हणाले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओदिशातील संबलपूर येथील आयआयएमच्या कॅप्सच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशभरातील आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी लोकलला ग्लोबल करण्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे आलं पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. "भारतासाठी आता उत्तम वेळ आली आहे. आजचे स्टार्टअप्सचं उद्याच्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी बनतील. संबलपूर हे मोठं एज्युकेशन हब म्हणून उदयास येत आहे. संबलपूरच्या लोकललाही व्होकल बनवणं हे आपलं कर्तव्य आहे. जास्तीतजास्त स्टार्टअप्स हे २ टियर आणि ३ टियर शहरांमध्ये सुरू होत आहेत. शेतीपासून ते अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रांपर्यंत स्टार्टअपची व्याप्ती आता वाढत आहे," असं मोदी यावेळी म्हणाले. "देशातील नव्या क्षेत्रांमध्ये नवे अनुभव घेऊन बाहेर पडणारे मॅनेजमेंट तज्ज्ञ भारताला एका उंचीवर घेऊन जाण्यात मोलाची भूमिका निभावतील. भारतानं कोरोना महासाथीच्या संकटादरम्यानही गेल्या वर्षांच्या तुलनेत अधिक यूनिकॉर्न दिले आहेत. गेल्या दशकामध्ये भारतानं एक नवा ट्रेंड अनुभवला आहे. बाहेरील अनेक मल्टी नॅशनल कंपन्या भारतात आल्या आणि भारताच्याच भूमिवर त्यांनी विकासही केला. हे दशक आणि हा काळ भारतात नव्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या निर्मितीचा आहे," असंही त्यांनी नमूद केलं. नव्या कल्पना शोधण्याची गरजलोकलला ग्लोबल बनवण्यासाठी आयआयएमच्या विद्यार्थ्यांना आणखी नव्या इनोव्हेटिव्ह कल्पना शोधण्याची गरज आहे. आयआयएम स्थानिक उत्पादनं आणि जागतीक सहकार्य यांच्यातील एक पूल बनण्याचं काम करू शकतो. जेव्हा तुमच्यातील अनेक जण संबलपुरी टेक्सटाईल आणि कटकच्या फिलिगीरीला जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी आपलं कौशल्य वापरती, येथील पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करतील, तेव्हा आत्मनिर्भर भारत मोहिमेसह ओदिशाच्या विकासालाही गती मिळणार असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. मॅनेजमेंट स्किलच्या मागणीत वाढ"काम करण्याची पद्धत आणि मॅनेजमेंट स्किल्सची मागणी झपाट्यानं वाढत आहे. आज अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॅनेजमेंटची गरज आहे. कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची कल्पनेमुळे संपूर्ण जग ग्लोबल व्हिलेजमधून ग्लोबल वर्कप्लेसमध्ये बदललं आहे. भारतानंही हे नवे बदल गेल्या काही महिन्यात झपाट्यानं केले आहे," असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतStudentविद्यार्थी