शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 07:17 IST

कटक : एकीकडे केंद्रात अब्जाधीशांसाठी सरकार चालवले जाते, तर दुसरीकडे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक अशा सरकारचे नेतृत्व करतात जे ...

कटक : एकीकडे केंद्रात अब्जाधीशांसाठी सरकार चालवले जाते, तर दुसरीकडे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक अशा सरकारचे नेतृत्व करतात जे केवळ निवडक लोकांसाठी काम करतात, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. बीजू जनता दल (बीजेडी) आणि भाजप एकमेकांविरुद्ध निवडणूक लढत असले तरी प्रत्यक्षात ते एकत्र काम करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

सालेपूर येथे एका प्रचारसभेत गांधी म्हणाले की, बीजेडी आणि भाजप दोघेही एकत्र आहेत. पटनायक मुख्यमंत्री असतानाही राज्यातील बीजेडी सरकार त्यांचे सहकारी व्ही. के. पांडियन चालवत आहेत. जमिनी हडप करून त्यांनी २० हजार कोटींची लूट केली. वृक्षारोपण घोटाळा १५,००० कोटी रुपयांचा होता. इथे आणि दिल्लीत सरकार बनताच तुमचे पैसे परत देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सत्तेवर आल्यास बेरोजगारांना शिकाऊ उमेदवारी मिळेल,  पहिल्या नोकरीची वर्षासाठी हमी देऊ.  ओडिशात सरकार स्थापन केल्यास महिलांना दरमहा २ हजार, बेरोजगारांना ३ हजार रुपये दरमहा, २०० युनिट मोफत वीज, सिलिंडर ५०० रुपयांना देऊ, असे राहुल म्हणाले.

‘हताशेमुळे भीती पसरवण्यात येत आहे’

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यांत हताशेला सामोरे गेल्यानंतर आता सत्ताधारी भय पसरवण्यात गुंतले आहेत, असा आरोप काँग्रेसने रविवारी केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबत पोस्ट केले. ‘दुसरा टप्पा संपल्यानंतर भीती पसरविली जात आहे.

खोटे बोलण्याऐवजी आणि भीती दाखवण्याऐवजी, भाजपच्या खासदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून इतकी खराब कामगिरी का केली? सात महिन्यांच्या विलंबानंतरही केंद्राने २० टक्क्यांपेक्षा कमी दुष्काळ निवारण निधी का दिला? केंद्राने अप्पर भद्रा आणि महादयी प्रकल्प का रोखून धरले? या पश्नांची उत्तरे द्यावीत, असे रमेश म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४