शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

थंडीचा कहर! उत्तर भारतात अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर; जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 12:21 IST

उत्तर भारतासह देशातील अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर गेला आहे. नव्या वर्षातही थंडीची लाट कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. 

ठळक मुद्देउत्तर भारतात थंडीचा कहरहिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह अनेक भागात जोरदार बर्फवृष्टीराजस्थानातही तापमान उणे ४ अंशांवर; राज्यातही हुडहुडी

नवी दिल्ली : सन २०२० वर्ष सरताना थंडीचा जोरदार कहर संपूर्ण देशभरात असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर भारतासह देशातील अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर गेला आहे. नव्या वर्षातही थंडीची लाट कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. 

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. या भागात अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर गेला असून, चहुबाजूला बर्फाची चादर पसरल्याचे पाहायला मिळत आहे. डलहौजी भागात ४ फूट बर्फवृष्टी झाली. पर्यटकांसाठी ही पर्वणी असली, तरी अनेक ठिकाणी बर्फवृष्टीमुळे मार्ग बंद झाल्याची माहिती मिळत आहे. शिमला, सोलन, पटनीटॉप, बटोटे आणि अन्य ठिकाणी बर्फवृष्टी झाल्याचे समजते. 

राजस्थानातील माउंट अबू भागातील तापमान उणे ४ अंशांवर गेले आहे. माऊंट अबू भागातही बर्फाची चादर पसरली आहे. मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर गेल्यामुळे शेतकरी काहीसा चिंताग्रस्त झाला आहे. चणे, गहू, मेथी, बटाटे अशा पीकांचे नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. देशाची राजधानी दिल्लीतही थंडीची लहर कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचे समजते. 

राज्यातही हुडहुडी

मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १५ अंश नोंदविण्यात आले. चालू हंगामातील हा आतापर्यंतचा नीचांक आहे. विशेषत: कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. घसरलेल्या तापमानामुळे रात्री, पहाटे आणि दुपारीही येथील वातावरणात गारवा जाणवत आहे. मंगळवारी नोंदविण्यात आलेल्या तापमानानुसार माथेरानपेक्षा मुंबई अधिक थंड आहे. माथेरानचे किमान तापमान १७ तर मुंबईचे १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असलेल्या शीत वाऱ्यांमुळे मुंबईसह राज्यात तापमानात घसरण नोंदविण्यात येत आहे. ठाणे, नवी मुंबई, बीकेसी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, चारकोप, बोरीवली, विद्याविहार, पवई, मुलुंड, नेरूळ आणि पनवेल येथे किमान तापमान १५ अंश नोंदवले गेले.

 

टॅग्स :Snowfallबर्फवृष्टीJammu Kashmirजम्मू-काश्मीरHimachal Pradeshहिमाचल प्रदेशdelhiदिल्लीRajasthanराजस्थानTemperatureतापमान