शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

तटरक्षक दल सक्षम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 4:35 AM

भारताच्या सागरी सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाºया तटरक्षक दलासाठी केंद्र सरकारने ३१ हजार ७४८ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

नवी दिल्ली : भारताच्या सागरी सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणा-या तटरक्षक दलासाठी केंद्र सरकारने ३१ हजार ७४८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या पाच वर्षांत तटरक्षक दलाला अधिक शक्तिशाली आणि सक्रिय करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे २00८ साली मुंबईत घुसून केलेल्या हल्ल्यानंतर तटरक्षक दलाच्या भूमिकेला महत्त्व आले आहे.तटरक्षक दलाची टेहळणी क्षमता वाढविण्यासाठी नव्या गस्ती नौका, बोटी, हेलिकॉप्टर, विमाने आणि अन्य उपकरणे विकत घेण्यात येणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला संरक्षण सचिव संजय मित्रा यांच्याकडे झालेल्या बैठकीत तटरक्षक दलासाठीच्या खरेदी व्यवहारांना मंजुरी देण्यात आली.समुद्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तटरक्षक दलाच्या ताफ्यात २0२२ पर्यंत १७५ बोटी व ११0 विमानांचा समावेश करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सागरी संपत्तीचे संरक्षण, सागरी पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण, तस्करी, समुद्री चाचांविरोधात कारवाई यांचा मुकाबला करण्यासाठी तटरक्षक दलाला पूर्णपणे सुसज्ज करण्याची योजना आहे.>7516किलोमीटरचा सागरी किनारा भारताला लाभला असून, त्यात १३८२ बेटे आहेत.तटरक्षक दलाच्या १३0 युनिटकडे सध्या ६0 बोटी, १८ हॉव्हरक्राफ्ट, ५२ छोट्या इंटरसेप्ट बोटी, ३९ डॉनियर टेहळणी विमाने, १९ चेतक हॅलिकॉप्टर व चार ध्रुव हॅलिकॉप्टर्स आहेत.>वसई किनाºयावर नजरवसई-विरारच्या किनाºयावर सुरक्षेसाठी गस्त वाढविण्यात आली असून, सर्व सागरी चेकपोस्टची सुरक्षा कडक करण्यात आली आहे.याशिवाय सर्व लँडिंग पॉइंट्सवर नाकाबंदी करण्यात आली आहे. सागरी किनारपट्टीवर पालघर पोलिसांतर्फे सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात येते.नियमितपणे स्पीड बोटीने किनारपट्टीवर गस्त घालून संशयास्पद बोटींची तपासणी करण्यात येते.