शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

'लव जिहाद'कडे केरळ सरकार संपूर्णपणे दुर्लक्ष करतंय; योगी आदित्यनाथ यांची टीका

By देवेश फडके | Updated: February 22, 2021 10:56 IST

केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हळूहळू सर्वपक्षीयांची आपापल्या पद्धतीने तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) केरळमधील कासारगोड येथे एका रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी कोरोना संकट तसेच 'लव जिहाद'वरून योगी आदित्यनाथ यांनी केरळ सरकारवर टीका केली.

ठळक मुद्देयोगी आदित्यनाथ यांची केरळ सरकारवर टीकालव जिहाद प्रकरणी केरळ उच्च न्यायालयाचा दिला संदर्भकोरोनावर प्रभावी उपाययोजना करण्यात केरळ सरकार अपयशी - योगी आदित्यनाथ

कासारगोड :केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हळूहळू सर्वपक्षीयांची आपापल्या पद्धतीने तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) केरळमधील कासारगोड येथे एका रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी कोरोना संकट तसेच 'लव जिहाद'वरून योगी आदित्यनाथ यांनी केरळ सरकारवर टीका केली. (up cm yogi adityanath slams kerala government over love jihad)

केरळमधील भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी 'विजय यात्रे'चे उद्घाटन योगी आदित्यनाथ यांनी केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी केरळ सरकार आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

मागच्या सरकारवर खापर कशाला? इंधन दरवाढीवरून सोनिया गांधींचे पंतप्रधानांना खरमरीत पत्र

केरळ उच्च न्यायालयाचा दिला संदर्भ

सन २००९ मध्ये केरळ उच्च न्यायालयाने 'लव जिहाद'संदर्भात टिप्पणी केली होती. मात्र, 'लव जिहाद' रोखण्यासाठी केरळ सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. 'लव जिहाद'मुळे केरळ इस्लामिक राज्य होईल, असे केरळ उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीवेळी नमूद केले होते, असा दावा करत केरळ सरकारने त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. 

कोरोनाच्या बाबतीतही अपयशी

केरळ सरकारने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळेच केरळमध्ये कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. याउलट उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या उपायांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी ठेवण्यात सरकारला यश येत आहे, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला. दरम्यान, केरळमधील १४ जिल्हे आणि मोठ्या विधानसभा मतदारसंघात विजय यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेचा कालावधी १५ दिवसांचा असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकृत प्रचार अभियानाच्या दृष्टीने याकडे पाहिले जात आहे.

तत्पूर्वी, 'लव जिहाद' आणि धार्मिक स्वतंत्रता यासंदर्भात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारकडून विशेष कायदे आणले गेले आहेत. यामधील कायद्यांचा उद्देश 'लव जिहाद' आणि कपटाने किंवा जबरदस्तीने धर्मांतरण रोखणे असा असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळyogi adityanathयोगी आदित्यनाथLove Jihadलव्ह जिहादBJPभाजपा