शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

Yogi Adityanath: “तालिबानी मानसिकता खपवून घेतली जाणार नाही”; योगी आदित्यनाथ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 17:55 IST

Yogi Adityanath: तालिबानी मानसिकता असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

कैराना:उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. कैराना येथे ४२५ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या विकासकामांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी लोकार्पण केले. यावेळी जनतेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तालिबानी मानसिकता खपवून घेतली जाणार नाही. तालिबानी मानसिकता असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

तालिबानी मानसिकता काही झाले, तरी खपवून घेतली जाणार नाही. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. आमच्या अस्मितेला तडा जाऊ देणारे तसेच दंगली घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर इतकी कठोर कारवाई केली जाईल की, त्याच्या पुढील पिढ्या दंगली काय असतात, हेही विसरून जातील, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी यावेळी दिला. 

केवळ कट्टर धार्मिकतावाद्यांकडून तालिबानचे समर्थन

उत्तर प्रदेशच्या भूमीवर तालिबानी कृत्याचे जो समर्थन करेल, त्यावर कठोर कारवाई केली जाईल. तालिबानी कृत्यांचे समर्थन करणे म्हणजे समाजाला मध्य युगाकडे नेण्यासारखे आहे. धार्मिक कट्टरतावाद्यांकडून तालिबानी कृत्याचे समर्थन केले जात आहे. मात्र, या गोष्टी उत्तर प्रदेशमध्ये चालू देणार नाही, असेही योगी आदित्यनाथ यांनी ठणकावून सांगितले. तसेच कैराना येथून पलायनाच्या घटनांबाबत योगी आदित्यनाथ म्हणाले की, हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. तर प्रदेश आणि देशाच्या आन, बान आणि शानचा प्रश्न आहे. आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. अयोध्येतील राम मंदिराबाबत, अनुच्छेद ३७० रद्द केल्याबाबत या लोकांना आनंद होत नाही, तर मुजफ्फरनगर येथे दंगली झाल्यावर यांना आनंद होतो. अशा तालिबानी मानसिकतेला उत्तर प्रदेशात थारा नाही, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

दरम्यान, सन २०१५ ते २०१७ या कालावधीत सुमारे ९० हिंदू कुटुंबीयांनी कैराना भागातून पलायन केले होते. घराबाहेर विक्रीसाठी घर उपलब्ध आहे, असे फलकही लावण्यात आले होते. तत्कालीन भाजप खासदार हुकुम सिंह यांनी याबाबत आवाज उठवला होता. यापैकी बहुतांश हिंदू कुटुंबीय कैराना येथे परत आली आहेत. तर, आता उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्यामुळे पलायन केलेली कुटुंबे आता परतली आहेत, असा दावा योगी सरकारकडून केला जात आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशTalibanतालिबान