शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Yogi Adityanath: “तालिबानी मानसिकता खपवून घेतली जाणार नाही”; योगी आदित्यनाथ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 17:55 IST

Yogi Adityanath: तालिबानी मानसिकता असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

कैराना:उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. कैराना येथे ४२५ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या विकासकामांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी लोकार्पण केले. यावेळी जनतेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तालिबानी मानसिकता खपवून घेतली जाणार नाही. तालिबानी मानसिकता असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

तालिबानी मानसिकता काही झाले, तरी खपवून घेतली जाणार नाही. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. आमच्या अस्मितेला तडा जाऊ देणारे तसेच दंगली घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर इतकी कठोर कारवाई केली जाईल की, त्याच्या पुढील पिढ्या दंगली काय असतात, हेही विसरून जातील, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी यावेळी दिला. 

केवळ कट्टर धार्मिकतावाद्यांकडून तालिबानचे समर्थन

उत्तर प्रदेशच्या भूमीवर तालिबानी कृत्याचे जो समर्थन करेल, त्यावर कठोर कारवाई केली जाईल. तालिबानी कृत्यांचे समर्थन करणे म्हणजे समाजाला मध्य युगाकडे नेण्यासारखे आहे. धार्मिक कट्टरतावाद्यांकडून तालिबानी कृत्याचे समर्थन केले जात आहे. मात्र, या गोष्टी उत्तर प्रदेशमध्ये चालू देणार नाही, असेही योगी आदित्यनाथ यांनी ठणकावून सांगितले. तसेच कैराना येथून पलायनाच्या घटनांबाबत योगी आदित्यनाथ म्हणाले की, हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. तर प्रदेश आणि देशाच्या आन, बान आणि शानचा प्रश्न आहे. आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. अयोध्येतील राम मंदिराबाबत, अनुच्छेद ३७० रद्द केल्याबाबत या लोकांना आनंद होत नाही, तर मुजफ्फरनगर येथे दंगली झाल्यावर यांना आनंद होतो. अशा तालिबानी मानसिकतेला उत्तर प्रदेशात थारा नाही, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

दरम्यान, सन २०१५ ते २०१७ या कालावधीत सुमारे ९० हिंदू कुटुंबीयांनी कैराना भागातून पलायन केले होते. घराबाहेर विक्रीसाठी घर उपलब्ध आहे, असे फलकही लावण्यात आले होते. तत्कालीन भाजप खासदार हुकुम सिंह यांनी याबाबत आवाज उठवला होता. यापैकी बहुतांश हिंदू कुटुंबीय कैराना येथे परत आली आहेत. तर, आता उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्यामुळे पलायन केलेली कुटुंबे आता परतली आहेत, असा दावा योगी सरकारकडून केला जात आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशTalibanतालिबान