शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

'बबुआ' रंग बदलतायत, आजकाल त्यांना स्वप्नही खूप पडतायत'; योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 21:18 IST

योगी आदित्यनाथ यांनी देवबंद येथे एटीएस कमांडो ट्रेनिंग सेंटरची पायाभरणी केली आणि विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि मोबाईलचे वाटप केले. तसेच फायर स्टेशनचे लोकार्पणही केले.

सहारनपूर - समाजवादी पक्षाचे बबुआदेखील आता रंग बदलू लागले आहेत. ते म्हणत आहेत, की त्यांचे सरकार असते, तर राम मंदिर बांधले असते. आजकाल त्यांना स्वप्नंही खूप पडत आहेत. स्वप्नात येऊन देवही त्यांना म्हणत आहेत, की जेव्हा  सरकारमध्ये होते, तेव्हा कोसी कलाची दंगल करवत होते, जवाहर बाग हत्याकांड घडवला, मुझफ्फरनगर दंगली घडवल्या. यांच्याकडे बघून सरड्यालाही लाज वाटत असेल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी देवबंद (Deoband) येथे जाहीर सभेत बोलत होते.

योगी आदित्यनाथ यांनी देवबंद येथे एटीएस कमांडो ट्रेनिंग सेंटरची पायाभरणी केली आणि विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि मोबाईलचे वाटप केले. तसेच फायर स्टेशनचे लोकार्पणही केले.

सहारनपूरमध्ये लोकांना अनेक सुविधा दिल्या जात आहेत. तुमच्या सुरक्षिततेसाठी एटीएस प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी करण्यात आली आहे. आम्ही येथे टॅब्लेट्सचे वाटपही केले आहे. गेल्या सरकारमध्ये आग लावली जात होती, आम्ही ती विझवण्याचे काम करत आहोत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण आणि ऑनलाइन परीक्षा देता याव्यात यासाठी टॅब्लेट आणि स्मार्टफोन देण्यात येत आहेत. आम्ही एक कोटी टॅब्लेट/स्मार्टफोन वितरित करत आहोत. आम्ही येथे एटीएस प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी केली आहे. यापूर्वी यूपीमध्ये अनेक दहशतवादी हल्ले व्हायचे.

मुलींच्या सुरक्षिततेसाठी जे लोक धोकादायक होते, त्यांनाही माहीत आहे, की त्यांचे काय हाल होणार आहेत. कोरोनामध्ये जे लोक स्थलांतरित होत होते. तेही आता भाजीपाला विकण्यासाठी हातगाडी लावत आहेत. यापूर्वी कधी गुन्हेगारी नियंत्रणावर चर्चा होत नव्हती. सहारनपूरमध्ये विद्यापीठ देण्याचे कामही आम्ही केले आहे. या विद्यापीठाला माँ शाकुंबरी देवी  नाव देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, यापूर्वी अखिलेश यादव पाच वर्षांतून एकदाही आले नव्हते, मी डझनभरवेळा आलो आहे. पूर्वीच्या सरकारांमध्ये दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचे काम केले जात होते. आता आम्ही दहशतवाद्यांना ठोकण्यासाठी एटीएस कमांडो तैनात करत आहोत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश