शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

“आता कोणतीही भीती नाही ना?”; योगींनी घेतली हिंदू कुटुंबीयांची भेट, कैरानात झाली घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 14:53 IST

उत्तर प्रदेशमधील कैराना येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हिंदू कुटुंबीयांची भेट घेतली.

कैराना: उत्तर प्रदेशमधील कैराना येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हिंदू कुटुंबीयांची भेट घेतली. या कुटुंबीयांनी कैराना येथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यामुळे घरं-दारं सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन वास्तव केले होते. मात्र, आता यातील काही हिंदू कुटुंबीयांची घरवापसी झाली आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ कैराना येथे गेले होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी एका कुटुंबातील लहान मुलीला आता कोणतीही भीती नाही ना, अशी विचारणा केली. यावर त्या मुलीने नकारार्थी मान हलवली.

कैराना येथून काही व्यापारी कुटुंबीयांनी गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या भागातून पलायन केले होते. मात्र, आता या कुटुंबीयांची घरवापसी झाली आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सुरक्षिततेसंदर्भात आश्वस्त केले. येथील काही कुटुंबे कैराना सोडून दिल्ली, हरियाणा आणि गुजरात या भागात स्थायिक झाले होते, अशी माहिती मिळाली आहे. 

बहुतांश कुटुंबीयांची घरवापसी

या पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यावर योगी आदित्यनाथ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या भागात आधी गुंडाराज होता. मात्र, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. अनेकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, असे सांगत पीडित हिंदू कुटुंबांची भेट घेणे गुन्हा आहे का, अशी विचारणा योगी आदित्यनाथ यांनी केली. तसेच कैराना येथे आता पीएसी तैनात केले जाणार आहेत. कैराना भागातील बहुतांश कुटुंबे पुन्हा आपल्या गावी परत आली आहेत, असे आदित्यनाथ म्हणाले. योगी आदित्यनाथ यांनी सुमारे २० मिनिटे या कुटुंबीयांशी चर्चा केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि मंत्री सुरेश राणा उपस्थित होते. 

दरम्यान, सन २०१५ ते २०१७ या कालावधीत सुमारे ९० हिंदू कुटुंबीयांनी कैराना भागातून पलायन केले होते. घराबाहेर विक्रीसाठी घर उपलब्ध आहे, असे फलकही लावण्यात आले होते. तत्कालीन भाजप खासदार हुकुम सिंह यांनी याबाबत आवाज उठवला होता. तर, आता उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्यामुळे पलायन केलेली कुटुंबे आता परतली आहेत, असा दावा योगी सरकारकडून केला जात आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश