शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“आता कोणतीही भीती नाही ना?”; योगींनी घेतली हिंदू कुटुंबीयांची भेट, कैरानात झाली घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 14:53 IST

उत्तर प्रदेशमधील कैराना येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हिंदू कुटुंबीयांची भेट घेतली.

कैराना: उत्तर प्रदेशमधील कैराना येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हिंदू कुटुंबीयांची भेट घेतली. या कुटुंबीयांनी कैराना येथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यामुळे घरं-दारं सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन वास्तव केले होते. मात्र, आता यातील काही हिंदू कुटुंबीयांची घरवापसी झाली आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ कैराना येथे गेले होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी एका कुटुंबातील लहान मुलीला आता कोणतीही भीती नाही ना, अशी विचारणा केली. यावर त्या मुलीने नकारार्थी मान हलवली.

कैराना येथून काही व्यापारी कुटुंबीयांनी गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या भागातून पलायन केले होते. मात्र, आता या कुटुंबीयांची घरवापसी झाली आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सुरक्षिततेसंदर्भात आश्वस्त केले. येथील काही कुटुंबे कैराना सोडून दिल्ली, हरियाणा आणि गुजरात या भागात स्थायिक झाले होते, अशी माहिती मिळाली आहे. 

बहुतांश कुटुंबीयांची घरवापसी

या पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यावर योगी आदित्यनाथ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या भागात आधी गुंडाराज होता. मात्र, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. अनेकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, असे सांगत पीडित हिंदू कुटुंबांची भेट घेणे गुन्हा आहे का, अशी विचारणा योगी आदित्यनाथ यांनी केली. तसेच कैराना येथे आता पीएसी तैनात केले जाणार आहेत. कैराना भागातील बहुतांश कुटुंबे पुन्हा आपल्या गावी परत आली आहेत, असे आदित्यनाथ म्हणाले. योगी आदित्यनाथ यांनी सुमारे २० मिनिटे या कुटुंबीयांशी चर्चा केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि मंत्री सुरेश राणा उपस्थित होते. 

दरम्यान, सन २०१५ ते २०१७ या कालावधीत सुमारे ९० हिंदू कुटुंबीयांनी कैराना भागातून पलायन केले होते. घराबाहेर विक्रीसाठी घर उपलब्ध आहे, असे फलकही लावण्यात आले होते. तत्कालीन भाजप खासदार हुकुम सिंह यांनी याबाबत आवाज उठवला होता. तर, आता उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्यामुळे पलायन केलेली कुटुंबे आता परतली आहेत, असा दावा योगी सरकारकडून केला जात आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश