शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

योगी आदित्यनाथ म्हणाले, 'हा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश; आम्ही पुन्हा सत्तेत येऊ अन्...'

By देवेश फडके | Updated: March 4, 2021 13:35 IST

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशची घोडदौड नमूद करत विरोधकांवर जोरदार टीका केली. राज्याचा जीडीपी हा गेल्या चार वर्षात दुप्पट झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

ठळक मुद्देमी पुन्हा येईन - योगी आदित्यनाथ यांना विश्वासअशा पद्धतीने उत्तर प्रदेशचा युरोप करणार का - योगी आदित्यनाथ यांची विचारणाहा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश - योगी आदित्यनाथ

प्रयागराज :उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशची घोडदौड नमूद करत विरोधकांवर जोरदार टीका केली. राज्याचा जीडीपी हा गेल्या चार वर्षात दुप्पट झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. (cm yogi adityanath claims we will come to power again)

सन २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा विजय संपादन करून सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले की, गेल्या चार वर्षात अनेक महत्त्वाचे बदल राज्यात करण्यात आले आहेत. थोडा धीर धरा. संयम बाळगा. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ आणि देशात उत्तर प्रदेशला आर्थिक आघाडीवर प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, असे योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत सांगितले. 

राहुल गांधींना RSS समजून घ्यायला बराच वेळ लागेल; प्रकाश जावेडकरांचा टोला

नव्या भारताचा उत्तर प्रदेश

आम्ही सत्तेत आलो, तेव्हाचेच प्रशासन आहे, तीच माणसे आहेत, महसुलाचा स्रोतही तोच आहे, सर्व गोष्टी यापूर्वी होत्या तशाच आहेत, आम्ही केवळ कार्यपद्धती बदलली, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. हा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश आहे. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ आणि उत्तर प्रदेशमधील स्थलांतर थांबवू, असा दावाही त्यांनी यावेळी केला. राज्यातील मोठ्या प्रमाणात झालेल्या स्थलांतरावरूनही विरोधकांवर जोरदार टीका केली. 

अशा पद्धतीने उत्तर प्रदेशचा युरोप करणार का?

शास्त्री भवनाची दुर्दशा का झाली?, अशी विचारणा करत मुख्यमंत्री कार्यालयात चौकशी केली तेव्हा समजले की, माजी मुख्यमंत्री केवळ वर्षातून एक ते दोन वेळाच तेथे जात असत. काही मंत्री तर मंत्रिमंडळ बैठकीला केवळ १० मिनिटे उपस्थिती लावत होते. अशा पद्धतीने उत्तर प्रदेशचा युरोप करणार का, असा खरमरीत सवाल योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना विचारला. 

पुढील लढाई योगी आणि कर्मयोगींची 

योगी आदित्यनाथ यांच्या टीकेवर पलटवार करताना विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी म्हणाले की, तुम्ही योगी असाल किंवा नसाल, अखिलेश यादव कर्मयोगी आहेत. २०२२ मधील लढाई योगी विरुद्ध कर्मयोगी अशी होईल, असे प्रत्युत्तर राम कोविंद चौधरी यांनी दिले. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथPoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी