शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

"मला बुलडोजर पाठवावा लागला..."; बांगलादेशी घुसखोरांवरून योगींचा AAP वर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:57 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करत, आपच्या नेत्यांनी त्यांना वसवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जामियाजवळील यूपीच्या जमिनीवरही असेच काही घडले होते, तेव्हा आपण बुलडोझर कारवाई केली आणि सर्वांना हटवले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर तेट निशाणा साधला. योगींनी प्रथम किराडी आणि नंतर करोल बाग येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी, रस्ते, वीज, पाणी आणि गटार यांसारख्या मुद्द्यांवर आप सरकारला घेरले. यावेळी त्यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करतही आपला घेरले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करत, आपच्या नेत्यांनी त्यांना वसवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जामियाजवळील यूपीच्या जमिनीवरही असेच काही घडले होते, तेव्हा आपण बुलडोझर कारवाई केली आणि सर्वांना हटवले. यावेळी त्यांनी जामिया आणि ओखलासह शाहीन बागचाही उल्लेख केला.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी ओखला औद्योगिक क्षेत्र आणि न्यू ओखला (नोएडा) येथील उद्योगांची तुलना करत, आरोप केला की, आप सरकार बांगलादेशी घुसखोरांना वसवण्यात व्यस्त आहे. योगी म्हणाले, "त्यांच्याकडे केवळ एकच उद्योग आहे. त्यांनी ओखला आणि दिल्लीतील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांना वसवण्याचे काम केले. दोन वर्षांपूर्वी, जामिया मिलिया आणि त्याच्या आसपासच्या भागात, उत्तर प्रदेश सरकारच्या सिंचन विभागाच्या जमिनीवर, त्यांचे आमदार, अधिकारी आणि नगरसेवकांनी बांगलादेशी घुसखोरांना वसवले होते हे तुम्ही पाहिले असेलच. मी त्यांना दोन-तीन वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की उत्तर प्रदेशच्या जमिनीवर वसवू नका. पण त्यांनी ऐकले नाही. शेवटी मला उत्तर प्रदेशातून बुलडोझर पाठवावे लागले. मी निर्दयतेने सरकारी जमीन खाली केली. नंतर, तेथे बॅरिकेड करण्यात आले आणि तेथे यूपी पीएसी तैनात करण्यात आली."

योगी पुढे म्हणाले, "दिल्लीतील जनतेसाठी एखादी संस्था बनत असेल, काही सुविधा तयार होत असेल, तर आपण जमीन उपलब्ध करून देऊ. मात्र, परदेशी घुसखोरांसाठी एक इंचही जमीन देणार नाही." 

दिल्लीतील दंगलींचा उल्लेख करताना योगी म्हणाले, "दिल्लीत वीज, पाणी, सार्वजनिक सुविधा नाहीत. मात्र, बांगलादेशी घुसखोरांच्या मदतीने, येथील नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने २०२० मध्ये निर्दयीपणे दंगल घडवून आणली. त्यांनी शाहीन बागमध्ये कशा प्रकारे अराजक आणि गुंडगिरीचे काम केले. याची आठवण करून देत योगी म्हणाले, ज्या राज्यांमध्ये भाजप सरकार सत्तेत आहे, तेथे स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण आहे."

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाAAPआप