शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

"मला बुलडोजर पाठवावा लागला..."; बांगलादेशी घुसखोरांवरून योगींचा AAP वर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:57 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करत, आपच्या नेत्यांनी त्यांना वसवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जामियाजवळील यूपीच्या जमिनीवरही असेच काही घडले होते, तेव्हा आपण बुलडोझर कारवाई केली आणि सर्वांना हटवले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर तेट निशाणा साधला. योगींनी प्रथम किराडी आणि नंतर करोल बाग येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी, रस्ते, वीज, पाणी आणि गटार यांसारख्या मुद्द्यांवर आप सरकारला घेरले. यावेळी त्यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करतही आपला घेरले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करत, आपच्या नेत्यांनी त्यांना वसवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जामियाजवळील यूपीच्या जमिनीवरही असेच काही घडले होते, तेव्हा आपण बुलडोझर कारवाई केली आणि सर्वांना हटवले. यावेळी त्यांनी जामिया आणि ओखलासह शाहीन बागचाही उल्लेख केला.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी ओखला औद्योगिक क्षेत्र आणि न्यू ओखला (नोएडा) येथील उद्योगांची तुलना करत, आरोप केला की, आप सरकार बांगलादेशी घुसखोरांना वसवण्यात व्यस्त आहे. योगी म्हणाले, "त्यांच्याकडे केवळ एकच उद्योग आहे. त्यांनी ओखला आणि दिल्लीतील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांना वसवण्याचे काम केले. दोन वर्षांपूर्वी, जामिया मिलिया आणि त्याच्या आसपासच्या भागात, उत्तर प्रदेश सरकारच्या सिंचन विभागाच्या जमिनीवर, त्यांचे आमदार, अधिकारी आणि नगरसेवकांनी बांगलादेशी घुसखोरांना वसवले होते हे तुम्ही पाहिले असेलच. मी त्यांना दोन-तीन वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की उत्तर प्रदेशच्या जमिनीवर वसवू नका. पण त्यांनी ऐकले नाही. शेवटी मला उत्तर प्रदेशातून बुलडोझर पाठवावे लागले. मी निर्दयतेने सरकारी जमीन खाली केली. नंतर, तेथे बॅरिकेड करण्यात आले आणि तेथे यूपी पीएसी तैनात करण्यात आली."

योगी पुढे म्हणाले, "दिल्लीतील जनतेसाठी एखादी संस्था बनत असेल, काही सुविधा तयार होत असेल, तर आपण जमीन उपलब्ध करून देऊ. मात्र, परदेशी घुसखोरांसाठी एक इंचही जमीन देणार नाही." 

दिल्लीतील दंगलींचा उल्लेख करताना योगी म्हणाले, "दिल्लीत वीज, पाणी, सार्वजनिक सुविधा नाहीत. मात्र, बांगलादेशी घुसखोरांच्या मदतीने, येथील नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने २०२० मध्ये निर्दयीपणे दंगल घडवून आणली. त्यांनी शाहीन बागमध्ये कशा प्रकारे अराजक आणि गुंडगिरीचे काम केले. याची आठवण करून देत योगी म्हणाले, ज्या राज्यांमध्ये भाजप सरकार सत्तेत आहे, तेथे स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण आहे."

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाAAPआप