शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

"मला बुलडोजर पाठवावा लागला..."; बांगलादेशी घुसखोरांवरून योगींचा AAP वर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:57 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करत, आपच्या नेत्यांनी त्यांना वसवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जामियाजवळील यूपीच्या जमिनीवरही असेच काही घडले होते, तेव्हा आपण बुलडोझर कारवाई केली आणि सर्वांना हटवले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर तेट निशाणा साधला. योगींनी प्रथम किराडी आणि नंतर करोल बाग येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी, रस्ते, वीज, पाणी आणि गटार यांसारख्या मुद्द्यांवर आप सरकारला घेरले. यावेळी त्यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करतही आपला घेरले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करत, आपच्या नेत्यांनी त्यांना वसवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जामियाजवळील यूपीच्या जमिनीवरही असेच काही घडले होते, तेव्हा आपण बुलडोझर कारवाई केली आणि सर्वांना हटवले. यावेळी त्यांनी जामिया आणि ओखलासह शाहीन बागचाही उल्लेख केला.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी ओखला औद्योगिक क्षेत्र आणि न्यू ओखला (नोएडा) येथील उद्योगांची तुलना करत, आरोप केला की, आप सरकार बांगलादेशी घुसखोरांना वसवण्यात व्यस्त आहे. योगी म्हणाले, "त्यांच्याकडे केवळ एकच उद्योग आहे. त्यांनी ओखला आणि दिल्लीतील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांना वसवण्याचे काम केले. दोन वर्षांपूर्वी, जामिया मिलिया आणि त्याच्या आसपासच्या भागात, उत्तर प्रदेश सरकारच्या सिंचन विभागाच्या जमिनीवर, त्यांचे आमदार, अधिकारी आणि नगरसेवकांनी बांगलादेशी घुसखोरांना वसवले होते हे तुम्ही पाहिले असेलच. मी त्यांना दोन-तीन वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की उत्तर प्रदेशच्या जमिनीवर वसवू नका. पण त्यांनी ऐकले नाही. शेवटी मला उत्तर प्रदेशातून बुलडोझर पाठवावे लागले. मी निर्दयतेने सरकारी जमीन खाली केली. नंतर, तेथे बॅरिकेड करण्यात आले आणि तेथे यूपी पीएसी तैनात करण्यात आली."

योगी पुढे म्हणाले, "दिल्लीतील जनतेसाठी एखादी संस्था बनत असेल, काही सुविधा तयार होत असेल, तर आपण जमीन उपलब्ध करून देऊ. मात्र, परदेशी घुसखोरांसाठी एक इंचही जमीन देणार नाही." 

दिल्लीतील दंगलींचा उल्लेख करताना योगी म्हणाले, "दिल्लीत वीज, पाणी, सार्वजनिक सुविधा नाहीत. मात्र, बांगलादेशी घुसखोरांच्या मदतीने, येथील नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने २०२० मध्ये निर्दयीपणे दंगल घडवून आणली. त्यांनी शाहीन बागमध्ये कशा प्रकारे अराजक आणि गुंडगिरीचे काम केले. याची आठवण करून देत योगी म्हणाले, ज्या राज्यांमध्ये भाजप सरकार सत्तेत आहे, तेथे स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण आहे."

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाAAPआप