शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

“केवळ बोललो नाही, करून दाखवले; आम्ही वचन पाळले, मंदिर तिथेच बांधले”: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 18:00 IST

CM Yogi Adityanath: अयोध्येत भव्य राम मंदिर झाले. आता काशी आणि मथुरा विसरता येणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

CM Yogi Adityanath: देशातील अनेक राज्यांमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्येही विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही केवळ बोलत नाही, तर करून दाखवतो. आम्ही दिलेला शब्द पाळला. मंदिर तिथेच बांधले, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टपणे सांगितले.

तत्पूर्वी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेथ यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये सर्वांत मोठा भ्रष्टाचार होत आहे. यापूर्वी असा भ्रष्टाचार कधी पाहिला नाही. अयोध्येत जमीन खरेदीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. या भ्रष्टाचाऱ्यांना सरकारचे संरक्षण आहे. भ्रष्टाचारासंदर्भात योगी सरकारचे कोणतेही धोरण नाही, या शब्दांत अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला. 

केवळ बोललो नाही, करून दाखवले; आम्ही वचन पाळले

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर देताना सांगितले की, २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. भारताच्या गौरवाची पुनर्स्थापना झाली. अयोध्येला गमावलेली गरिमा परत मिळाली. आम्हाला आनंद वाटतो की, आम्ही आमचे वचन पूर्ण केले. मंदिर तिथेच बांधले. आम्ही केवळ बोलत नाही, तर करून दाखवतो. गेली अनेक वर्षे अयोध्येवर अन्याय झाला. तेथील स्थानिकांवर अन्याय झाला, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

काशी आणि मथुरा विसरू शकत नाही

पांडवांनी कौरवांकडे केवळ पाच गावांची मागणी केली होती. मात्र, ही मागणी कौरवांनी पूर्ण केली नाही. देशातील बहुसंख्य समाज केवळ तीन ठिकाणांची मागणी करत आहे. पैकी अयोध्येत भव्य मंदिर बांधण्यात आले. आता काशी आणि मथुरा विसरता येणार नाही. ही गोष्ट देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच व्हायला हवी होती. मात्र, व्होट बँकेच्या नावाखाली लोकांच्या आस्थेचा विचार करण्यात आला नाही, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली. 

दरम्यान, अयोध्येच्या विकासासाठी ३१ हजार कोटी रुपयांच्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. आता अयोध्येचे स्वरूप भव्य होत आहे. आधी कर्फ्यू लागल्यासारखी शांतता असायची आता मंगलगानाचे सूर कानी ऐकू येतात. जगभरातील लोक, पर्यटक आता अयोध्येत येत आहेत. अयोध्येला जगाची सांस्कृतिक राजधानी करण्याचे लक्ष्य समोर ठेवून कामकाज केले जात आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारण