शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

“केवळ बोललो नाही, करून दाखवले; आम्ही वचन पाळले, मंदिर तिथेच बांधले”: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 18:00 IST

CM Yogi Adityanath: अयोध्येत भव्य राम मंदिर झाले. आता काशी आणि मथुरा विसरता येणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

CM Yogi Adityanath: देशातील अनेक राज्यांमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्येही विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही केवळ बोलत नाही, तर करून दाखवतो. आम्ही दिलेला शब्द पाळला. मंदिर तिथेच बांधले, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टपणे सांगितले.

तत्पूर्वी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेथ यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये सर्वांत मोठा भ्रष्टाचार होत आहे. यापूर्वी असा भ्रष्टाचार कधी पाहिला नाही. अयोध्येत जमीन खरेदीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. या भ्रष्टाचाऱ्यांना सरकारचे संरक्षण आहे. भ्रष्टाचारासंदर्भात योगी सरकारचे कोणतेही धोरण नाही, या शब्दांत अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला. 

केवळ बोललो नाही, करून दाखवले; आम्ही वचन पाळले

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर देताना सांगितले की, २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. भारताच्या गौरवाची पुनर्स्थापना झाली. अयोध्येला गमावलेली गरिमा परत मिळाली. आम्हाला आनंद वाटतो की, आम्ही आमचे वचन पूर्ण केले. मंदिर तिथेच बांधले. आम्ही केवळ बोलत नाही, तर करून दाखवतो. गेली अनेक वर्षे अयोध्येवर अन्याय झाला. तेथील स्थानिकांवर अन्याय झाला, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

काशी आणि मथुरा विसरू शकत नाही

पांडवांनी कौरवांकडे केवळ पाच गावांची मागणी केली होती. मात्र, ही मागणी कौरवांनी पूर्ण केली नाही. देशातील बहुसंख्य समाज केवळ तीन ठिकाणांची मागणी करत आहे. पैकी अयोध्येत भव्य मंदिर बांधण्यात आले. आता काशी आणि मथुरा विसरता येणार नाही. ही गोष्ट देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच व्हायला हवी होती. मात्र, व्होट बँकेच्या नावाखाली लोकांच्या आस्थेचा विचार करण्यात आला नाही, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली. 

दरम्यान, अयोध्येच्या विकासासाठी ३१ हजार कोटी रुपयांच्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. आता अयोध्येचे स्वरूप भव्य होत आहे. आधी कर्फ्यू लागल्यासारखी शांतता असायची आता मंगलगानाचे सूर कानी ऐकू येतात. जगभरातील लोक, पर्यटक आता अयोध्येत येत आहेत. अयोध्येला जगाची सांस्कृतिक राजधानी करण्याचे लक्ष्य समोर ठेवून कामकाज केले जात आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारण