शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

“केवळ बोललो नाही, करून दाखवले; आम्ही वचन पाळले, मंदिर तिथेच बांधले”: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 18:00 IST

CM Yogi Adityanath: अयोध्येत भव्य राम मंदिर झाले. आता काशी आणि मथुरा विसरता येणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

CM Yogi Adityanath: देशातील अनेक राज्यांमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्येही विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही केवळ बोलत नाही, तर करून दाखवतो. आम्ही दिलेला शब्द पाळला. मंदिर तिथेच बांधले, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टपणे सांगितले.

तत्पूर्वी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेथ यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये सर्वांत मोठा भ्रष्टाचार होत आहे. यापूर्वी असा भ्रष्टाचार कधी पाहिला नाही. अयोध्येत जमीन खरेदीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. या भ्रष्टाचाऱ्यांना सरकारचे संरक्षण आहे. भ्रष्टाचारासंदर्भात योगी सरकारचे कोणतेही धोरण नाही, या शब्दांत अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला. 

केवळ बोललो नाही, करून दाखवले; आम्ही वचन पाळले

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर देताना सांगितले की, २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. भारताच्या गौरवाची पुनर्स्थापना झाली. अयोध्येला गमावलेली गरिमा परत मिळाली. आम्हाला आनंद वाटतो की, आम्ही आमचे वचन पूर्ण केले. मंदिर तिथेच बांधले. आम्ही केवळ बोलत नाही, तर करून दाखवतो. गेली अनेक वर्षे अयोध्येवर अन्याय झाला. तेथील स्थानिकांवर अन्याय झाला, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

काशी आणि मथुरा विसरू शकत नाही

पांडवांनी कौरवांकडे केवळ पाच गावांची मागणी केली होती. मात्र, ही मागणी कौरवांनी पूर्ण केली नाही. देशातील बहुसंख्य समाज केवळ तीन ठिकाणांची मागणी करत आहे. पैकी अयोध्येत भव्य मंदिर बांधण्यात आले. आता काशी आणि मथुरा विसरता येणार नाही. ही गोष्ट देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच व्हायला हवी होती. मात्र, व्होट बँकेच्या नावाखाली लोकांच्या आस्थेचा विचार करण्यात आला नाही, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली. 

दरम्यान, अयोध्येच्या विकासासाठी ३१ हजार कोटी रुपयांच्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. आता अयोध्येचे स्वरूप भव्य होत आहे. आधी कर्फ्यू लागल्यासारखी शांतता असायची आता मंगलगानाचे सूर कानी ऐकू येतात. जगभरातील लोक, पर्यटक आता अयोध्येत येत आहेत. अयोध्येला जगाची सांस्कृतिक राजधानी करण्याचे लक्ष्य समोर ठेवून कामकाज केले जात आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारण