शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

CM नितीश कुमारांच्या अडचणीत वाढ; महिला आयोगाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 13:42 IST

आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना नितीश कुमार म्हणाले, 'मी तर केवळ महिलांच्या शिक्षणा संदर्भात बोललो होतो

नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात विधानसभेत केलेल्या बेताल वक्तव्यानंतर, केवळ बिहारच नव्हे, तर संपूर्ण देशातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यासंदर्भात नितीश यांनीही जाहीर माफी मागितली आहे. मात्र, आता राष्ट्रीय महिला आयोगाने नितीश कुमार यांच्या वक्तव्याची दखल घेत थेट विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही आयोगाने केली आहे.  

आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना नितीश कुमार म्हणाले, 'मी तर केवळ महिलांच्या शिक्षणा संदर्भात बोललो होतो. मी काही चूक बोललो असेल, मी माफी मागतो. जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, मी त्यांचेही अभिनंदन करतो.", असे म्हणत त्यांनी विधानसभेतील विधानावर माफी मागितली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन आता राजकारण तापलं आहे. भाजपाच्या महिला नेत्यांनी नितीश कुमार यांची गाडी अडवून नारेबाजी केली तर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसींनीही नितीश कुमार यांच्या विधानावरुन टीका केली आहे. आता, महिला आयोगाने या विधानाची दखल घेतली.  राष्ट्रीय महिला आयोगाने बिहार विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांना पत्र लिहून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विधानसभेतील विधानाची तपासणी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोग १९९० च्या कलम १० अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हे पत्र लिहून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच, नितीश कुमार यांच्या विधानाचा निषेधही केला आहे.  

काय म्हणाले होते नितीश - 

बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (७ नोव्हेंबर) चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते, "बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित होत आहेत, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. हे समजून सांण्यासाठी नितीश कुमारांनी एक विचित्र उदाहरण दिले. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळेच मूलं जन्माला येतात. महिला साक्षर असेल, तर ती पुरुषाला नकार देऊ शकते, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल."

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारWomenमहिलाChief Ministerमुख्यमंत्री