शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 18:09 IST

'पंतप्रधान मोदी संपूर्ण देशासाठी काम करत आहेत आणि त्यांनी बिहारसाठीही खूप काही केले आहे.'

जमुई: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लहरी स्वभावाचे आहेत. ते कधी भाजपच्या नेतृत्वातील NDA मध्ये येतात तर कधी काँग्रेसच्या नेतृत्वातील UPA/INDIA आघादीत जातात. काही महिन्यांपूर्वी, म्हणजेच लोकसभा निवडणुकीपूर्वी ते इंडिया आघाडीशी फारकत घेत एनडीएमध्ये सामील झाले. ते कधीही भाजपची साथ सोडू शकतात, अशी चर्चा नेहमी राजकीय वर्तुळात रंगते. पण, यापुढे भाजपची साथ सोडणार नसल्याचे नितीश कुमारांनी सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी शुक्रवारी जमुई येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित आदिवासी गौरव दिन सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी 6,640 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी व्यासपीठावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते. यावेळी त्यांनी पीएम मोदींना आश्वासन दिले की, ते यापुढे भाजपची साथ सोडणार नाहीत.

उपस्थितांना संबोधित करताना नितीश कुमार म्हणाले की, "मधल्या काळात चूक झाली, आमच्या काही लोकांमुळे हे घडलं. पण, आम्ही आता ठरवलंय की, यापुढे कुठेही जाणार नाही. आम्ही 1995 पासून एकत्र आहोत आणि तेव्हापासून एकत्र काम करत आहोत. आम्ही अटलबिहारी वाजपेयींसोबत त्यांच्या सरकारमध्ये होतो. आता यापुढे कधीही इकडे तिकडे जाणार नाही. पंतप्रधान मोदी संपूर्ण देशासाठी काम करत आहेत आणि त्यांनी बिहारसाठीही खूप काही केलं आहे, असंही नितीश कुमार यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार