शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 18:09 IST

'पंतप्रधान मोदी संपूर्ण देशासाठी काम करत आहेत आणि त्यांनी बिहारसाठीही खूप काही केले आहे.'

जमुई: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लहरी स्वभावाचे आहेत. ते कधी भाजपच्या नेतृत्वातील NDA मध्ये येतात तर कधी काँग्रेसच्या नेतृत्वातील UPA/INDIA आघादीत जातात. काही महिन्यांपूर्वी, म्हणजेच लोकसभा निवडणुकीपूर्वी ते इंडिया आघाडीशी फारकत घेत एनडीएमध्ये सामील झाले. ते कधीही भाजपची साथ सोडू शकतात, अशी चर्चा नेहमी राजकीय वर्तुळात रंगते. पण, यापुढे भाजपची साथ सोडणार नसल्याचे नितीश कुमारांनी सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी शुक्रवारी जमुई येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित आदिवासी गौरव दिन सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी 6,640 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी व्यासपीठावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते. यावेळी त्यांनी पीएम मोदींना आश्वासन दिले की, ते यापुढे भाजपची साथ सोडणार नाहीत.

उपस्थितांना संबोधित करताना नितीश कुमार म्हणाले की, "मधल्या काळात चूक झाली, आमच्या काही लोकांमुळे हे घडलं. पण, आम्ही आता ठरवलंय की, यापुढे कुठेही जाणार नाही. आम्ही 1995 पासून एकत्र आहोत आणि तेव्हापासून एकत्र काम करत आहोत. आम्ही अटलबिहारी वाजपेयींसोबत त्यांच्या सरकारमध्ये होतो. आता यापुढे कधीही इकडे तिकडे जाणार नाही. पंतप्रधान मोदी संपूर्ण देशासाठी काम करत आहेत आणि त्यांनी बिहारसाठीही खूप काही केलं आहे, असंही नितीश कुमार यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार