शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

'हे रामराज्य आहे का किलिंग राज्य?', लखीमपूर हिंसाचारावरुन ममता बॅनर्जी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 19:46 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लखीमपूर येथील हिंसाचाराच्या प्रकरणावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली:उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याची घटना घडली. त्यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू झालाय. दरचम्यान, या प्रकरणावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लखीमपूर प्रकरणावरुन भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. 'भाजप सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही, फक्त हुकूमशाही कारभार येतो', असं त्या म्हणाल्या. तसेच, 'ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. या घटनेवर टीका करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हे राम राज्य आहे का किलिंग राज्य?' असा सवाल त्यांनी केला.

राज्य सरकारकडून मदतीची घोषणादरम्यान, या हिंसक संघर्षात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 45-45 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. यासह आठ दिवसांच्या आत या प्रकरणाची चौकशी करुन आरोपीला अटक करण्याचा विश्वासही सरकारने व्यक्त केलाय.

नेमकं काय घडलं ?उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याची घटना घडली. त्यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर लखीमपूर येथे शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांच्या गाडीसह इतर गाड्यांची जाळपोळ केली. हिंसाचारामध्ये एक पत्रकार आणि चार शेतकऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर देशभरातील विरोधी पक्षांकडून सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMamata Banerjeeममता बॅनर्जीFarmers Protestशेतकरी आंदोलन