शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

CM ममतांनी घेतली PM मोदींची भेट; कोरोना लस अन् राज्याचं नाव बदलण्याचा मुद्दा केला उपस्थित...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 18:27 IST

CM Mamata Banerjee : यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री कमलनाथ आणि आनंद शर्मा यांचीही भेट घेतली. याच बरोबर, त्या मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेऊ शकतात.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी ममतांनी राज्यातील कोरोना स्थिती आणि लसीचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, 'आज पंतप्रधानांसोबत शिष्टाचार बैठक झाली. या बैठकीत मी राज्यातील कोरोना स्थिती आणि अधिक लसी तसेच औषधांचा मुद्दा उपस्थित केला. याच बरोबर मी प्रलंबित असलेला राज्याचे नाव बदलण्याचा मुद्दाही उपस्थित केला. यावर, ते या प्रकरणांवर लक्ष देतील, असे त्यांनी म्हटले आहे.' (CM Mamata Banerjee meets PM Narendra Modi)

यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री कमलनाथ आणि आनंद शर्मा यांचीही भेट घेतली. याच बरोबर, त्या मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेऊ शकतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री सोमवरपासून पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची धुरा हाती घेतल्यानंतर हा ममतांचा पहिलाच दिल्ली दौरा आहे. 

CoronaVirus: चिंताजनक! "आपण थकलो आहोत, कोरोना नाही!" 22 जिल्ह्यांत महिनाभरापासून वाढतायत कोरोना रुग्ण

ममता बुधवारी दहा जनपथ येथे सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत. अभिषेक मनू सिंघवींसह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना त्या भेटणार असल्याचे समजते.  तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 26-30 जुलैदरम्यानच्या आपल्या दौऱ्यात ममता बॅनर्जी संसदेतही जाऊ शकतात. सथ्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याच बरोबर, त्या 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अँटी-बीजेपी फ्रंट तयार करण्याच्या शक्यतांची चाचपणी करण्यासाठी राजधानी दिल्लीत विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठकही करणार आहेत.

बंगा भवनमध्ये विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्याची भेट -टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटल्यानुसार, दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी बंगा भवनमध्ये विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्याची भेट घेऊ शकतात. तसेच यासाठी त्यांनी निमंत्रणही पाठविले आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगाल