शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केंद्राकडून दुजाभाव, विरोधी पक्षांच्या राज्यांना पैसेच देत नाहीत; ममता बॅनर्जींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 22:03 IST

केंद्रातील मोदी सरकार राज्यांसोबत दुजाभाव करत असून, विरोधी पक्षांच्या राज्यांना केंद्राकडून येणारी रक्कम दिली जात नसल्याचा दावा केला आहे.

कोलकाता: एकीकडे केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील मोदी सरकार राज्यांसोबत दुजाभाव करत असून, विरोधी पक्षांच्या राज्यांना केंद्राकडून येणारी रक्कम दिली जात नसल्याचा दावा केला आहे. (cm mamata banerjee criticised modi govt on deprived 60 thousand crore rupees)

केंद्र सरकारने अर्थसंकल्पावेळी पश्चिम बंगालसाठी केंद्रीय करांच्या थकबाकीसाठी ५८ हजार ९६२ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, त्यातील केवळ ४४ हजार ७३७ कोटी रुपये देण्यात आली. तसेच गेल्या आर्थिक वर्षातील केंद्राकडून देय असलेली ११ हजार कोटी रुपयांची रक्कमही पश्चिम बंगालला मिळालेली नाही. केंद्राच्या विविध योजना, करापोटी देय असलेली रक्कम असे सुमारे ६० हजार कोटी रुपये केंद्राकडून येणे बाकी असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 

विरोधी पक्षांच्या राज्यांना पैसेच देत नाहीत

केंद्राकडून भाजपशासित राज्यांना प्राधान्याने देय रक्कम तसेच योजनांसाठी पैसे दिले जातात. मात्र, विरोधी पक्षांच्या सरकारची देणी वेळेवर दिली जात नाहीत, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार रुपये ठेवण्यात आले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर टप्प्याटप्प्याने यासंदर्भातील तरतूद करण्यात आली. ही तरतूद एकत्रितपणे का केली नाही, अशी विचारणाही ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

सामान्यांच्या खिशाला कात्री लावून तिजोरी भरली जातेय

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून केंद्राने सामान्य जनतेचा खिसा कापून आपली तिजोरी भरण्याचे काम केले जात आहे. तसेच इंधनदरवाढीतून केंद्राने ३ लाख ७१ कोटी रुपये कमावले, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभेने मंगळवारी भारतीय राज्यघटनेतील कलम ३६९ अन्वये राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव पारित केला. सभागृहात उपस्थित असलेल्या एकूण २६५ सभासदांपैकी १९६ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. तर ६९ सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. पश्चिम बंगालमध्ये विधान परिषदेची स्थापना करण्याचे आश्वासन तृणमूल काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यामधून दिले होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जीCentral Governmentकेंद्र सरकारwest bengalपश्चिम बंगाल