शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

केंद्राकडून दुजाभाव, विरोधी पक्षांच्या राज्यांना पैसेच देत नाहीत; ममता बॅनर्जींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 22:03 IST

केंद्रातील मोदी सरकार राज्यांसोबत दुजाभाव करत असून, विरोधी पक्षांच्या राज्यांना केंद्राकडून येणारी रक्कम दिली जात नसल्याचा दावा केला आहे.

कोलकाता: एकीकडे केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील मोदी सरकार राज्यांसोबत दुजाभाव करत असून, विरोधी पक्षांच्या राज्यांना केंद्राकडून येणारी रक्कम दिली जात नसल्याचा दावा केला आहे. (cm mamata banerjee criticised modi govt on deprived 60 thousand crore rupees)

केंद्र सरकारने अर्थसंकल्पावेळी पश्चिम बंगालसाठी केंद्रीय करांच्या थकबाकीसाठी ५८ हजार ९६२ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, त्यातील केवळ ४४ हजार ७३७ कोटी रुपये देण्यात आली. तसेच गेल्या आर्थिक वर्षातील केंद्राकडून देय असलेली ११ हजार कोटी रुपयांची रक्कमही पश्चिम बंगालला मिळालेली नाही. केंद्राच्या विविध योजना, करापोटी देय असलेली रक्कम असे सुमारे ६० हजार कोटी रुपये केंद्राकडून येणे बाकी असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 

विरोधी पक्षांच्या राज्यांना पैसेच देत नाहीत

केंद्राकडून भाजपशासित राज्यांना प्राधान्याने देय रक्कम तसेच योजनांसाठी पैसे दिले जातात. मात्र, विरोधी पक्षांच्या सरकारची देणी वेळेवर दिली जात नाहीत, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार रुपये ठेवण्यात आले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर टप्प्याटप्प्याने यासंदर्भातील तरतूद करण्यात आली. ही तरतूद एकत्रितपणे का केली नाही, अशी विचारणाही ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

सामान्यांच्या खिशाला कात्री लावून तिजोरी भरली जातेय

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून केंद्राने सामान्य जनतेचा खिसा कापून आपली तिजोरी भरण्याचे काम केले जात आहे. तसेच इंधनदरवाढीतून केंद्राने ३ लाख ७१ कोटी रुपये कमावले, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभेने मंगळवारी भारतीय राज्यघटनेतील कलम ३६९ अन्वये राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव पारित केला. सभागृहात उपस्थित असलेल्या एकूण २६५ सभासदांपैकी १९६ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. तर ६९ सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. पश्चिम बंगालमध्ये विधान परिषदेची स्थापना करण्याचे आश्वासन तृणमूल काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यामधून दिले होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जीCentral Governmentकेंद्र सरकारwest bengalपश्चिम बंगाल