शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

CM Eknath Shinde on OBC Reservation: “ओबीसी आरक्षणासाठी तुषार मेहतांना भेटलो”; एकनाथ शिंदेंनी मांडली स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 15:55 IST

CM Eknath Shinde on OBC Reservation: अनेकांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी मागणी केली आहे. सरकारचीही तीच भूमिका आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथविधी झाल्यानंतर दिल्ली दौरा केला. यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. मात्र, यासह सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची घेतलेली भेट लक्षवेधी ठरली. यानंतर या दोघांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सदर भेट असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३८ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाने पटापट पावले उचलत, यापैकी १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली. मात्र, याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव धेतली. शिवसेना आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाला दिलासा देत यावरील सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलली. यानंतर राज्यातील सत्ता संघर्ष पराकोटीला गेला आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची नामुष्की ओढावली. शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यातील ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहतांची भेट याचसंदर्भात असल्याबाबत चर्चा सुरू होती. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडत उत्तर दिले. 

ओबीसी आरक्षणासाठी तुषार मेहतांना भेटलो

ओबीसी आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे. यासंदर्भात तुषार मेहता यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करावे, यासाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. यासाठीच तुषार मेहतांनी प्रतिनिधित्व करावे, अशी विनंती करण्यासाठी आम्ही दोघेही त्यांना भेटलो, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच ओबीसी समाजाला न्याय मिळावा, हीच आमची आधीपासूनची भूमिका होती आणि आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात, हीच आमची इच्छा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूरस्थिती आहे. अशा परिस्थितीत निवडणुका घेणे, त्या यंत्रणा तिथे लावणे, याची मोठी तयारी करावी लागते. निवडणुकांचे वातावरण तयार व्हावे लागते. अनेकांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी मागणी केली आहे. सरकारचीही तीच भूमिका आहे. राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती लक्षात घेता, यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाची चर्चा करणार आहोत, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.  

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस