शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

CM Eknath Shinde on OBC Reservation: “ओबीसी आरक्षणासाठी तुषार मेहतांना भेटलो”; एकनाथ शिंदेंनी मांडली स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 15:55 IST

CM Eknath Shinde on OBC Reservation: अनेकांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी मागणी केली आहे. सरकारचीही तीच भूमिका आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथविधी झाल्यानंतर दिल्ली दौरा केला. यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. मात्र, यासह सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची घेतलेली भेट लक्षवेधी ठरली. यानंतर या दोघांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सदर भेट असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३८ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाने पटापट पावले उचलत, यापैकी १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली. मात्र, याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव धेतली. शिवसेना आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाला दिलासा देत यावरील सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलली. यानंतर राज्यातील सत्ता संघर्ष पराकोटीला गेला आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची नामुष्की ओढावली. शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यातील ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहतांची भेट याचसंदर्भात असल्याबाबत चर्चा सुरू होती. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडत उत्तर दिले. 

ओबीसी आरक्षणासाठी तुषार मेहतांना भेटलो

ओबीसी आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे. यासंदर्भात तुषार मेहता यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करावे, यासाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. यासाठीच तुषार मेहतांनी प्रतिनिधित्व करावे, अशी विनंती करण्यासाठी आम्ही दोघेही त्यांना भेटलो, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच ओबीसी समाजाला न्याय मिळावा, हीच आमची आधीपासूनची भूमिका होती आणि आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात, हीच आमची इच्छा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूरस्थिती आहे. अशा परिस्थितीत निवडणुका घेणे, त्या यंत्रणा तिथे लावणे, याची मोठी तयारी करावी लागते. निवडणुकांचे वातावरण तयार व्हावे लागते. अनेकांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी मागणी केली आहे. सरकारचीही तीच भूमिका आहे. राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती लक्षात घेता, यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाची चर्चा करणार आहोत, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.  

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस