शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

CM Eknath Shinde on OBC Reservation: “ओबीसी आरक्षणासाठी तुषार मेहतांना भेटलो”; एकनाथ शिंदेंनी मांडली स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 15:55 IST

CM Eknath Shinde on OBC Reservation: अनेकांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी मागणी केली आहे. सरकारचीही तीच भूमिका आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथविधी झाल्यानंतर दिल्ली दौरा केला. यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. मात्र, यासह सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची घेतलेली भेट लक्षवेधी ठरली. यानंतर या दोघांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सदर भेट असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३८ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाने पटापट पावले उचलत, यापैकी १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली. मात्र, याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव धेतली. शिवसेना आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाला दिलासा देत यावरील सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलली. यानंतर राज्यातील सत्ता संघर्ष पराकोटीला गेला आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची नामुष्की ओढावली. शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यातील ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहतांची भेट याचसंदर्भात असल्याबाबत चर्चा सुरू होती. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडत उत्तर दिले. 

ओबीसी आरक्षणासाठी तुषार मेहतांना भेटलो

ओबीसी आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे. यासंदर्भात तुषार मेहता यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करावे, यासाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. यासाठीच तुषार मेहतांनी प्रतिनिधित्व करावे, अशी विनंती करण्यासाठी आम्ही दोघेही त्यांना भेटलो, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच ओबीसी समाजाला न्याय मिळावा, हीच आमची आधीपासूनची भूमिका होती आणि आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात, हीच आमची इच्छा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूरस्थिती आहे. अशा परिस्थितीत निवडणुका घेणे, त्या यंत्रणा तिथे लावणे, याची मोठी तयारी करावी लागते. निवडणुकांचे वातावरण तयार व्हावे लागते. अनेकांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी मागणी केली आहे. सरकारचीही तीच भूमिका आहे. राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती लक्षात घेता, यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाची चर्चा करणार आहोत, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.  

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस