शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 11:30 IST

Rajasthan Assembly by Election : मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी टोंक जिल्ह्यातील देवली-उनियारा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राजेंद्र गुर्जर यांच्या समर्थनार्थ शनिवारी जाहीर सभेला संबोधित केले. 

राजस्थानमध्ये विधानसभेच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी टोंक जिल्ह्यातील देवली-उनियारा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राजेंद्र गुर्जर यांच्या समर्थनार्थ शनिवारी जाहीर सभेला संबोधित केले. 

यावेळी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची जीभ घसरली. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी स्पष्टपणे सांगितले. जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० लागू करण्याचा प्रस्ताव आणि सभागृहात घडलेल्या हाणामारीच्या घटनेचा संदर्भ देत काँग्रेसवर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमध्ये ज्यांनी कलम ३७० हटवले, त्यांच्याविरोधात काँग्रेस उभी आहे, असे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले.

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले की, "काल तुम्ही पाहिले असेल की जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे लोक त्यांच्यासोबत उभे आहेत, जे कलम ३७० पुन्हा लागू करण्यासंदर्भात बोलत आहेत. मला तुम्हाला विचारायचे आहे की, हे पुन्हा लागू केले जाऊ शकेल का? राहुल गांधींजी तुमची गोष्ट विसरा, तुम्ही तुमच्या वडिलांना आणले, तरी काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करता येणार नाही." तसेच, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णय हा मोदी सरकारने घेतलेल्या प्रमुख निर्णयांपैकी एक असल्याचे म्हटले आहे.

याचबरोबर, "आम्ही राम मंदिराची तारीख सांगितली आणि मंदिरही बांधले. काँग्रेस ही देशातील भ्रष्टाचाराची जननी आहे. काँग्रेसवाल्यांना द्वेषयुक्त भाषा आवडते. राजस्थानमध्ये जेव्हा कन्हैया लाल यांचा मृत्यू झाला, तेव्हा हे काँग्रेसवाले तोंडाला टेप लावून बसले", असा आरोप सुद्धा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केला. दरम्यान, राजस्थानमधील झुंझुनू, दौसा, देवली-उनियारा, खींवसार, चौरासी, सलुम्बर आणि रामगढ या जागांवर १३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRajasthanराजस्थानElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेसBJPभाजपाArticle 370कलम 370