शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

यमुनेच्या पाण्यासंदर्भात CM आतिशी यांनी केली होती तक्रार, EC नं थेट हरियाणाकडून मागवला अहवाल! नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 18:36 IST

...यानंतर, निवडणूक आयोगानेही मुख्यमंत्री आतिशी यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.

Delhi Assembly Election 2025: सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून राजकारण तापताना दिसत आहे. नेते मंडळींचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता विधानसभा निवडणुकीचा हा रणसंग्राम यमुनेच्या पाण्यावर येऊन ठेपला आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून हरियाणातील भाजप सरकारने यमुनेचे पाणी प्रदूषित केल्याचा आरोप केला होता. यानंतर, निवडणूक आयोगानेही मुख्यमंत्री आतिशी यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.

यासंदर्भात, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, "दिल्ली आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून एक निवेदन प्राप्त झाले आहे. यात, हरियाणामधून दिल्लीला मिळणाऱ्या पाण्यात अमोनियाचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयोगाने हरियाणा सरकारला उद्या (२८ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंत या संदर्भात तथ्यात्मक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

सीएम आतिशी यांनी केला होता आरोप - खरेतर, आम आदमी पक्षाने भाजपवर दिल्लीतील पाणीपुरवठ्यात अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी दावा केला की, हरियाणातील भाजप सरकार जाणूनबुजून कारखान्यांचे प्रदूषण यमुनेत टाकत आहे. यामुळे यमुनेत अमोनियाचे प्रमाण वाढले आहे. तसेच, दिल्लीतील तीन मोठे प्रक्रिया प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचेही आतिशी यांनी म्हेटले आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

हरियाणा सरकार वर केजरीवालांचा आरोप -सीएम आतिशी यांच्याशिवाय माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही हरियाणा सरकारवर आरोप केला होता. ते म्हणाले होते, "यमुनेचे पाणी हरियाणातून दिल्लीत येते. तेथील भाजप सरकारने यात विष मिसळले. दिल्ली जल बोर्ड सावध होते, जर ते सावध नसते तर अनेकांचा जीव जाऊ शकला असता. हे अराजकता निर्माण करण्यासाठी केले गेले. निवडणूक आयोगाने यात हस्तक्षेप करायला हवा."

काय म्हणाले हरियाणाचे मुख्यमंत्री -यानंतर, आम आदमी पक्षाच्या आरोपांवर हरियाणा सरकारची प्रतिक्रियाही आली आहे. यासंदर्भात बोलताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले, आरोप करून पळून जाणे, ही अरविंद केजरीवाल यांची सवय आहे. केजरीवाल यांनी यमुना नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांना हे शक्य झाले नही. मी क्वालिटी चेक करण्यासंदर्भात बोललो होतो. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Atishiआतिशीdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग