शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

यमुनेच्या पाण्यासंदर्भात CM आतिशी यांनी केली होती तक्रार, EC नं थेट हरियाणाकडून मागवला अहवाल! नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 18:36 IST

...यानंतर, निवडणूक आयोगानेही मुख्यमंत्री आतिशी यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.

Delhi Assembly Election 2025: सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून राजकारण तापताना दिसत आहे. नेते मंडळींचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता विधानसभा निवडणुकीचा हा रणसंग्राम यमुनेच्या पाण्यावर येऊन ठेपला आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून हरियाणातील भाजप सरकारने यमुनेचे पाणी प्रदूषित केल्याचा आरोप केला होता. यानंतर, निवडणूक आयोगानेही मुख्यमंत्री आतिशी यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.

यासंदर्भात, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, "दिल्ली आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून एक निवेदन प्राप्त झाले आहे. यात, हरियाणामधून दिल्लीला मिळणाऱ्या पाण्यात अमोनियाचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयोगाने हरियाणा सरकारला उद्या (२८ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंत या संदर्भात तथ्यात्मक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

सीएम आतिशी यांनी केला होता आरोप - खरेतर, आम आदमी पक्षाने भाजपवर दिल्लीतील पाणीपुरवठ्यात अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी दावा केला की, हरियाणातील भाजप सरकार जाणूनबुजून कारखान्यांचे प्रदूषण यमुनेत टाकत आहे. यामुळे यमुनेत अमोनियाचे प्रमाण वाढले आहे. तसेच, दिल्लीतील तीन मोठे प्रक्रिया प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचेही आतिशी यांनी म्हेटले आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

हरियाणा सरकार वर केजरीवालांचा आरोप -सीएम आतिशी यांच्याशिवाय माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही हरियाणा सरकारवर आरोप केला होता. ते म्हणाले होते, "यमुनेचे पाणी हरियाणातून दिल्लीत येते. तेथील भाजप सरकारने यात विष मिसळले. दिल्ली जल बोर्ड सावध होते, जर ते सावध नसते तर अनेकांचा जीव जाऊ शकला असता. हे अराजकता निर्माण करण्यासाठी केले गेले. निवडणूक आयोगाने यात हस्तक्षेप करायला हवा."

काय म्हणाले हरियाणाचे मुख्यमंत्री -यानंतर, आम आदमी पक्षाच्या आरोपांवर हरियाणा सरकारची प्रतिक्रियाही आली आहे. यासंदर्भात बोलताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले, आरोप करून पळून जाणे, ही अरविंद केजरीवाल यांची सवय आहे. केजरीवाल यांनी यमुना नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांना हे शक्य झाले नही. मी क्वालिटी चेक करण्यासंदर्भात बोललो होतो. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Atishiआतिशीdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग