शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

२०२४ मध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल सामना होणार?; दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 23:01 IST

आम्ही प्रामाणिक लोक आहे, आम्ही भ्रष्टाचार सहन करू शकत नाही. आम्ही देशभक्त आहोत. आप हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर आता तो एक विचारधारा आहे : अरविंद केंजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (AAP) विजयाचे रहस्य उघड केले. कट्टर प्रामाणिकपणा, कट्टर देशभक्ती आणि मानवता हे आपल्या पक्षाच्या विजयाचे मुख्य मंत्र असल्याचे केजरीवाल म्हणाले. गेल्या ७५ वर्षांच्या राजकीय संस्कृतीने त्रस्त झालेल्या लोकांनी आपोहूनच 'आप'ला निवडल्याचं त्यांनी सांगितलं.

"पाच वर्ष तुम्ही लुटा, पाच वर्ष आम्ही लुटतो या कल्चरमुळे पंजाबमधील लोक त्रस्त होते. ७५ वर्षांच्या राजकीय संस्कृतीनं त्रस्त असलेल्या लोकांनीच आपला विजय मिळवून दिला आहे. दिल्लीतील सात वर्षांच्या शासनकाळात लोकांना आप ही किती निराळा पक्ष आहे हे समजलं आहे," असंही केजरीवाल म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "पंजाबमध्ये आम्ही लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरलो आहोत. तिकडे आमच्या विजयाची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे त्या ठिकाणचे लोक राजकीय पक्षांपासून नाराज होते आणि दुसरं म्हणजे ते दिल्लीत काम करण्याच्या मॉडेलपासून प्रभावीत होते," असंही त्यांनी नमूद केलं.

आम्ही प्रामाणिक"आम्ही प्रामाणिक लोक आहे, आम्ही भ्रष्टाचार सहन करू शकत नाही. आम्ही देशभक्त आहोत. आप हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर आता तो एक विचारधारा आहे," असं केजरीवाल म्हणाले. आम्ही दोन राज्यांमध्ये सरकार स्थापन केलं आहे. अन्य राज्यांवरही आपलं लक्ष केंद्रित असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नावरही भाष्य केलं. "काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीसाठी भाजप जबाबदार आहे. जेव्हा काश्मीर खोऱ्यात मोठ्याप्रमाणात नरसंहार झाला, तेव्हा भाजपच्या पाठिंब्यानं केंद्रात सरकार होतं. त्यामुळे त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधानांचा सामना करणार का?जसा २०१४ मध्ये केला होता तसा २०२४ च्या निवडणुकीत केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करतील का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. "तो काळ वेगळा होता. २०२४ मध्ये आम्ही मोदींशी सामना करण्यास उत्सुक आहोत," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा