शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

"माझा शेतकऱ्यांना पाठींबा आहे म्हणून मोदी सरकार मला त्रास देतंय", अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 09:19 IST

Delhi CM Arvind Kejriwal And Farmers Protest : अरविंद केजरीवाल यांनी केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ रविवारी पंजाबमधील किसान महापंचायतीला संबोधित केले.

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये अनेक वेळा बैठका झाल्या असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान रविवारी पंजाबच्या मोगा येथे एका किसान महापंचायतचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ रविवारी पंजाबमधील किसान महापंचायतीला संबोधित केले. याच वेळी अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"माझा शेतकऱ्यांना पाठींबा आहे म्हणून मोदी सरकार मला त्रास देतंय" असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. किसान महापंचायतीला संबोधित करताना केजरीवालांनी "सुरुवातीपासूनच आपण शेतकरी आंदोलनात सहभागी आहोत आणि म्हणूनच मोदी सरकार आपल्यासाठी समस्या निर्माण करीत आहे" असं म्हटलं आहे. तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकार त्यांच्या सरकारकडून अधिकार हिसकावून घेण्यासाठी संसदेत विधेयक आणत आहे असा गंभीर आरोप देखील केला आहे, 

"मी मोदी सरकारला त्यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असं पत्र लिहिलं आहे. यावर मोदी सरकारला इतका संताप आला की गेल्या आठवड्यात त्यांनी असे विधेयक आणले की दिल्लीतील सर्व सत्ता मुख्यमंत्र्यांची नसून लेफ्टनंट गव्हर्नरची असेल. त्यांना राज्य सरकारकडून सर्व हक्क काढून घ्यायचे आहेत, म्हणजे पुढच्या वेळी कारागृह बनविण्याची फाईल लेफ्टनंट गव्हर्नरकडे जाईल. मोदी सरकारशी कसे लढावे हे मला माहीत आहे. मी दिल्लीत आहे तोपर्यंत, शेतकऱ्यांनी काळजी करू नये" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

तुम्ही श्रेय घ्या; परंतु गरिबांची रेशन योजना अडवू नका; अरविंद केजरीवालांचे मोदींना आवाहन

केजरीवाल सरकारतर्फे येत्या 25 मार्चपासून ‘मुख्यमंत्री घरघर रेशन योजना’अंतर्गत दिल्लीकरांना रेशन पुरवठा होणार होता. परंतु या योजनेला केंद्र सरकारने खोडा घातला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारला विनंती केली, आम्ही नावासाठी करीत नाही. हवे तर तुम्ही श्रेय घ्या, श्रम आमचे असतील, परंतु गरिबांच्या योजनेला अडवू नका!

दिल्लीसह काही राज्यांमध्ये केजरीवाल यांची वाढती लोकप्रियता मोदी सरकारला जिव्हारी लागत आहे. ‘आप’ सरकारने कोणतीही योजना आणली तरी त्याला कसे अडवता येईल हा केंद्र सरकारचा प्रयत्न असतो. याच श्रृंखलेत ‘मुख्यमंत्री घरघर राशन योजने’ला केंद्राकडून घरघर लावण्याचे प्रयत्न झालेत. केंद्राने केजरीवालांना पत्र लिहून तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या नावाने ही योजना सुरू करता येणार नाही, अशी तंबी दिली. केजरीवाल यांच्या भूमिकेवर केंद्र कोणती भूमिका घेते ते त्यावरच या योजनेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीPunjabपंजाबBJPभाजपाAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदी