शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आम आदमी पक्षाची विचारधारा कोणती? अरविंद केजरीवालांनी अखेर स्पष्टच सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 17:06 IST

आम आदमी पक्षाला कोणतीही विचारधारा नाही अशी टीका केली जाते यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीच्या विधानसभेत पक्षाच्या विचारधारेबाबत बोलताना विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली-

आम आदमी पक्षाला कोणतीही विचारधारा नाही अशी टीका केली जाते यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीच्या विधानसभेत पक्षाच्या विचारधारेबाबत बोलताना विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कट्टर देशभक्ती, प्रमाणिकपणा आणि मानवता हे आम आदमी पक्षाच्या विचारधारेचे तीन प्रमुख स्तंभ आहेत, असं केजरीवाल म्हणाले. रोजगाराचा प्रश्न स्वातंत्र्याच्या काळापासून आहे. रोजगाराची चर्चा निवडणुकीपूर्वीच व्हायची आणि निवडणुकीनंतर लोक विसरायचे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीचा अर्थसंकल्प रोजगारावर करण्यात आला आहे. हा माफक अर्थसंकल्प नसून ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे, असंही केजरीवाल म्हणाले. 

"कोणत्याही राजकीय पक्षानं निवडणुकीपूर्वी ५ वर्षांत २० लाख नोकऱ्या देण्याचं धाडस केलं नाही. शाळा, विजेप्रमाणेच आता इतर पक्षांनाही रोजगारावर चर्चा करावी लागणार आहे. जेव्हा सिग्नलजवळ वाहनं थांबतात तेव्हा मुलं भीक मागताना दिसतात. लहान मुलं रस्त्याच्या कडेला साहसी खेळ करताना दिसतात. त्यांना प्रशिक्षण मिळाल्यास ते ऑलिम्पिक पदक मिळवून देऊ शकतात. अशा मुलांसाठी आम्ही बोर्डिंग स्कूल बनवू", असं केजरीवाल म्हणाले. 

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, "आयकर विभागातील नोकरी सोडून झोपडपट्टीत राहायला लागलो तेव्हा तेथील परिस्थिती जाणून घेतली. जीटीबी हॉस्पिटलची अवस्था बिकट होती. औषधं उपलब्ध नव्हती. आज दिल्लीत गरीब असो की श्रीमंत, तुम्ही सरकारी रुग्णालयात मोफत चाचण्या आणि उपचार घेऊ शकता. आता गरीब व्यक्तीला उपचारासाठी स्वत:ला विकण्याची गरज भासत नाही" 

"रेशन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी त्यांना घरोघरी वितरण प्रणाली लागू करता आली नाही. केंद्र सरकारनं मला ही योजना लागू करू दिली नाही. या देशात आजवर जी काही सरकारं स्थापन झाली ती सर्व कामं बंद पाडण्यासाठी केली गेली आहेत. जनतेची कामं थांबवणं हे या सरकारचं काम झाले आहे. जनतेसाठी काम करणारं 'आप' हे पहिले सरकार आहे", असा दावा केजरीवाल यांनी केला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा