शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

आम आदमी पक्षाची विचारधारा कोणती? अरविंद केजरीवालांनी अखेर स्पष्टच सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 17:06 IST

आम आदमी पक्षाला कोणतीही विचारधारा नाही अशी टीका केली जाते यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीच्या विधानसभेत पक्षाच्या विचारधारेबाबत बोलताना विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली-

आम आदमी पक्षाला कोणतीही विचारधारा नाही अशी टीका केली जाते यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीच्या विधानसभेत पक्षाच्या विचारधारेबाबत बोलताना विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कट्टर देशभक्ती, प्रमाणिकपणा आणि मानवता हे आम आदमी पक्षाच्या विचारधारेचे तीन प्रमुख स्तंभ आहेत, असं केजरीवाल म्हणाले. रोजगाराचा प्रश्न स्वातंत्र्याच्या काळापासून आहे. रोजगाराची चर्चा निवडणुकीपूर्वीच व्हायची आणि निवडणुकीनंतर लोक विसरायचे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीचा अर्थसंकल्प रोजगारावर करण्यात आला आहे. हा माफक अर्थसंकल्प नसून ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे, असंही केजरीवाल म्हणाले. 

"कोणत्याही राजकीय पक्षानं निवडणुकीपूर्वी ५ वर्षांत २० लाख नोकऱ्या देण्याचं धाडस केलं नाही. शाळा, विजेप्रमाणेच आता इतर पक्षांनाही रोजगारावर चर्चा करावी लागणार आहे. जेव्हा सिग्नलजवळ वाहनं थांबतात तेव्हा मुलं भीक मागताना दिसतात. लहान मुलं रस्त्याच्या कडेला साहसी खेळ करताना दिसतात. त्यांना प्रशिक्षण मिळाल्यास ते ऑलिम्पिक पदक मिळवून देऊ शकतात. अशा मुलांसाठी आम्ही बोर्डिंग स्कूल बनवू", असं केजरीवाल म्हणाले. 

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, "आयकर विभागातील नोकरी सोडून झोपडपट्टीत राहायला लागलो तेव्हा तेथील परिस्थिती जाणून घेतली. जीटीबी हॉस्पिटलची अवस्था बिकट होती. औषधं उपलब्ध नव्हती. आज दिल्लीत गरीब असो की श्रीमंत, तुम्ही सरकारी रुग्णालयात मोफत चाचण्या आणि उपचार घेऊ शकता. आता गरीब व्यक्तीला उपचारासाठी स्वत:ला विकण्याची गरज भासत नाही" 

"रेशन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी त्यांना घरोघरी वितरण प्रणाली लागू करता आली नाही. केंद्र सरकारनं मला ही योजना लागू करू दिली नाही. या देशात आजवर जी काही सरकारं स्थापन झाली ती सर्व कामं बंद पाडण्यासाठी केली गेली आहेत. जनतेची कामं थांबवणं हे या सरकारचं काम झाले आहे. जनतेसाठी काम करणारं 'आप' हे पहिले सरकार आहे", असा दावा केजरीवाल यांनी केला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा