शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भारतविरोधी घोषणा बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2016 05:00 IST

कोणत्याही परिस्थितीत काश्मीरमध्ये भारतविरोधी घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा देतानाच, काश्मीरमधली सध्याची अशांतता

सुरेश भटेवरा, नवी दिल्ली कोणत्याही परिस्थितीत काश्मीरमध्ये भारतविरोधी घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा देतानाच, काश्मीरमधली सध्याची अशांतता आणि त्याला कारणीभूत असणाऱ्या अनेक घटनांमागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी बुधवारी राज्यसभेत केला. मात्र, आम्हीही स्वस्थ बसलो नसून, जगातली कोणतीही शक्ती काश्मीरला भारतापासून वेगळे करू शकणार नाही. पाकिस्तानशी या पुढे जेव्हा कधी चर्चा होईल, ती काश्मीरवर नव्हे, तर पाकव्याप्त काश्मीरवरच होईल, असे ठाम प्रतिपादन गृहमंत्री राजनाथसिंग यांनी राज्यसभेत केले. राज्यसभेतील चर्चेमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या सदस्यांनी काश्मिरात दिल्या जाणाऱ्या भारतविरोधी घोषणांचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि त्या खपवून घेता कामा नयेत, असा सूर लावला. तब्बल ७ तास चाललेल्या काश्मीरवरील चर्चेची सुरुवात विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली आणि त्यात विविध पक्षांच्या २४ सदस्यांनी भाग घेतला. सर्वांना उत्तर देताना गृहमंत्र्यांनी सरकारची भूमिका विस्ताराने मांडली. संसदेच्या वतीने काश्मिरी जनतेला सद्यस्थितीत विश्वासात घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी मांडलेला एक प्रस्तावही सभागृहात एकमताने मंजूर केला.काश्मीर समस्येबाबत सभागृहात झालेल्या चर्चेबाबत समाधान व्यक्त करीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांना उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, अमरनाथ यात्रा संपल्यानंतर अवघे काश्मीर खोरे सैन्यदलाच्या हवाली करण्यात येणार आहे, अशा बातम्या म्हणजे तद्दन अफवा आहेत. केंद्र सरकार असा विचार करूच शकत नाही. संसदेचे अधिवेशन समाप्त होताच, पंतप्रधानांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी १२ वाजता काश्मीर समस्येबाबत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करतानाच, काश्मीरमधील प्रश्नांबाबत तेथील, तसेच देशातील सर्व राजकीय पक्ष आणि स्थानिक जनतेशी व संबंधित घटकांशी चर्चा करायलाही सरकार तयार आहे, असे राजनाथसिंग म्हणाले. आमची बघ्याची भूमिका नाही - गृहमंत्रीगेल्या महिनाभरापासून तिथे जे काही घडते आहे, त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार बघ्याच्या भूमिकेत अजिबात नाही. या संवेदनशील स्थितीला संयमाने सामोरे जाण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. राज्यात गेल्या महिनाभरात ४,५१५ सुरक्षा दलाचे जवान व ३,३५६ नागरिक हिंसाचार व गोळीबाराच्या घटनांमधे जखमी झाले. काश्मीर खोऱ्यात दगडफेकीच्या घटनांमध्ये १00 रुग्णवाहिकांवर हल्ले चढवले गेले, तेव्हा जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ४00 आणखी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या. बेरोजगारीचा प्रश्न केवळ काश्मीरमध्येच नाही, तर जम्मू, लडाखसह देशातल्या अनेक राज्यांत आहे. मात्र, तिथे आझादीच्या घोषणा देत, इसिसचे झेंडे कोणी फडकावत नाही, असे स्पष्ट करीत गृहमंत्री म्हणाले, ‘जगाच्या पाठीवर हा सर्व धर्मांची कदर करणारा भारत हा एकमेव देश आहे.’ पाकपुरस्कृत अतिरेकी कारवायांचे व इस्लामच्या मूलतत्त्वांचीच राखरांगोळी करणाऱ्या इसिससारख्या दहशतवाद्यांचे असले, प्रयोग आम्ही भारताच्या भूमीवर आम्ही कदापि चालू देणार नाही, असे आत्मविश्वासपूर्ण उद्गारही गृहमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सभागृहाला ऐकवले. काश्मीरच्या सद्यस्थितीबाबत राज्यसभेत झालेली चर्चा हे भारताच्या उदात्त व सुदृढ लोकशाहीचे उत्तम उदाहरण असल्याची ग्वाही गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली. पंतप्रधान मोदी काश्मीर प्रश्नावर संसदेत बोलण्याऐवजी मध्य प्रदेशात का बोलले? या विरोधकांच्या सवालाचे उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, देशाच्या गृहविभागाची जबाबदारी पंतप्रधानांनी माझ्यावर सोपवली आहे. सभागृहात मी जे काही बोलतो, त्याच्याशी पंतप्रधान सहमतच आहेत. त्यांच्याशी विचारविनिमय करूनच सरकारची भूमिका मी मांडतो आहे. या खेरीज १२ आॅगस्टला सर्वपक्षीय बैठकीत आपल्या तमाम शंकांचे निरसन स्वत: पंतप्रधान करणारच आहेत.