स्मशानभूमीत केली साफसफाई
By Admin | Updated: January 23, 2017 20:13 IST2017-01-23T20:13:00+5:302017-01-23T20:13:00+5:30
जळगाव: एकीकडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेच्या सर्वेक्षणासाठी शहरात सर्वेक्षण सुरू असताना मनपाकडून दूर्लक्षित राहिलेल्या स्मशानभूमीत मात्र कचर्याचे ढीग असल्याने अंत्ययात्रा घेऊन आलेल्या नागरिकांनीच सफाई मोहीम राबवीत स्मशानभूमीत सफाई केल्याची घटना घडली. कांचननगर येथील ॲड.गणेश सोनवणे, सुरेश फालक व काही कार्यकर्ते हे एका अंत्ययात्रेसाठी नेरीनाका स्मशानभूमीत गेले होते. मात्र त्यांना तेथे घाणीचे साम्राज्य आढळून आल्याने सफाई मोहीम राबविली. मनपाने या ठिकाणी नियमित साफसफाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

स्मशानभूमीत केली साफसफाई
ज गाव: एकीकडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेच्या सर्वेक्षणासाठी शहरात सर्वेक्षण सुरू असताना मनपाकडून दूर्लक्षित राहिलेल्या स्मशानभूमीत मात्र कचर्याचे ढीग असल्याने अंत्ययात्रा घेऊन आलेल्या नागरिकांनीच सफाई मोहीम राबवीत स्मशानभूमीत सफाई केल्याची घटना घडली. कांचननगर येथील ॲड.गणेश सोनवणे, सुरेश फालक व काही कार्यकर्ते हे एका अंत्ययात्रेसाठी नेरीनाका स्मशानभूमीत गेले होते. मात्र त्यांना तेथे घाणीचे साम्राज्य आढळून आल्याने सफाई मोहीम राबविली. मनपाने या ठिकाणी नियमित साफसफाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.