शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

फ्लॅटफॉर्मवर झोपलेल्या प्रवाशांवर सफाई कर्मचाऱ्यांनी ओतलं पाणी, या रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 16:33 IST

lucknow Charbagh Railway Station: लखनौमधील चारबाग रेल्वे स्टेशनवर रात्री झोपलेल्या प्रवाशांवर सफाई कर्मचाऱ्यांनी अचानक पाणी फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे थंडीने हुडहुडी भरलेले ट्रेनची वाट पाहत असलेले प्रवासी उठले. त्यांच्याकडील सामान, अंथरूण पांघरुण पाण्यामुळे भिजून गेले.

सध्या संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे लोकांना रात्रीच्या वेळी घरातच राहणं पसंत करत आहेत. अशा परिस्थितीत थंडीपासून वाचण्यासाठी बस स्थानक, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी आसरा शोधत आहेत. तर रात्रीच्या वेळी असलेल्या ट्रेनमधून प्रवासाला जाणारे प्रवासीही रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर काही काळ थांबतात. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील लखनौमधून रेल्वे स्टेशनवरील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लखनौमधील चारबाग रेल्वे स्टेशनवर रात्री झोपलेल्या प्रवाशांवर सफाई कर्मचाऱ्यांनी अचानक पाणी फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे थंडीने हुडहुडी भरलेले ट्रेनची वाट पाहत असलेले प्रवासी उठले. त्यांच्याकडील सामान, अंथरूण पांघरुण पाण्यामुळे भिजून गेले. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. तसेच लोकांकडून झालेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांच्या संवेदनहिनतेबाबत रेल्वेने संबंधित एजन्सीकडून उत्तर मागितले आहे. तसेच पुन्हा असे न करण्याची ताकिद संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. चारबाग स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ आणि ९ वर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.  

याबाबत स्पष्टीकरण देताना उत्तर रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितले की, प्लॅटफॉर्म क्रमांक ८ आणि ९ वर सफाईचं काम सुरू असतानाचा हा व्हिडीओ आहे. प्रवाशांबाबत ज्या प्रकारची संवेदनहीनता दाखवण्यात आली त्याबाबत संबंधित एजन्सीकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. दरम्यान, लोकांकडून रेल्वे अधिकाऱ्यांबाबतही संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रवासी झोपले असताना त्यांच्यावर पाणी फेकून सफाई करणं योग्य आहे का, असा सवाल लोकांकडून विचारण्यात येत आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे