शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

८ वी ते १२ वीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करा; ‘एनसीईआरटी’ची सरकारला शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 23:28 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उन्हाळी सुट्यांनंतर शाळांची शैक्षणिक वर्षे कशा प्रकारे सुरू करता येतील याविषयी परिषदेचे मत मागविले होते.

नवी दिल्ली : कोरोना महामारीची परिस्थिती आटोक्यात आली व संपूर्ण देशातील ‘लॉकडाऊन’ उठविणे शक्य झाले, तर ८ वी ते १२ वीपर्यंतच्या इयत्तांचे पुढील शैक्षणिक वर्षाचे वर्ग जुलैच्या मध्यानंतर सुरू करावेत, अशी शिफारस राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी)ने केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उन्हाळी सुट्यांनंतर शाळांची शैक्षणिक वर्षे कशा प्रकारे सुरू करता येतील याविषयी परिषदेचे मत मागविले होते. सूत्रांनुसार परिषदेने आपल्या शिफारशींचा कच्चा मसुदा मंत्रालयास सादर केला आहे. अजून नक्की काही ठरलेले नाही व केंद्रीय गृहमंत्रालय ‘लॉकडाऊन’ व निर्बंधांसंबंधी काय निर्णय घेते, यावर शाळा पुन्हा सुरू होणे मुख्यत: अवलंबून असेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

परिषद म्हणते की, परिस्थिती पूर्ण सुरक्षित होईपर्यंत प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्तांचे (पहिली ते सातवी) वर्ग मात्र सुरू केले जाऊ नयेत. नव्या बदललेल्या परिस्थितीत वर्ग कसे घ्यावेत व ते घेताना काय काळजी घ्यावी याविषयी माहिती देऊन तयारी करून घेण्यासाठी प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याआधी शिक्षकांसाठी एखादा अल्पावधीचा आॅनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावा, असेही परिषदेने म्हटले आहे.

‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याचे आवाहन

33% विद्यार्थ्यांनाच हजर राहू द्यावे, असे सूचित करण्यात आले आहे. परिस्थिती अनुकूल असेल, तर ‘ग्रीन’ व ‘आॅरेंज झोन’मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्तांचे शालेय वर्ग जुलैच्या मध्यानंतर सुरू केले जाऊ शकतील. शिवाय ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी