शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

माजी क्रिकेटपटू बनणार बिहारच्या महाआघाडीत बिघाडी? वाद सोनियांच्या कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 22:40 IST

सोनिया गांधी यांनी विश्वासू नेते अहमद पटेल यांना हा वाद सोडविण्यासाठी पाचारण केले आहे.

पटना : उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी तुटलेली असताना काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बिहारमध्ये क्रिकेटरहून राजकीय नेते बनलेले कीर्ती आझाद यांच्या दरभंगा मतदारसंघावरील दाव्यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे रालेसपाच्या उपेंद्र कुशवाहा यांच्यासोबतही काराकाट आणि बेतिया जागेवरून पेच निर्माण झाला आहे. आता हा वाद काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे गेला असून 24 तासांची मुदत देण्यात आली आहे. 

सोनिया गांधी यांनी विश्वासू नेते अहमद पटेल यांना हा वाद सोडविण्यासाठी पाचारण केले आहे. शुक्रवारी सकाळी तुन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. यानंतरच बिहारमधील महायुतीचे भविष्य ठरणार आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेत तीन जागांवर पेच असल्याचे सांगितले. राजदने दरभंगा जागेऐवजी वाल्मिकीनगरची जागा ऑफर केली होती. परंतू काँग्रेसला ब्राम्हण उमेदवारासाठी बेतिया जास्त योग्य वाटले. बेतिया हे रालोसपाच्या वाट्याला आलेले आहे आणि ते ही जागा सोडायला तयार नाहीत. 

यातच काँग्रेसने कौकब कादरी यांच्यासाठी काराकाटच मागणी केली आहे. येथे उपेंद्र कुशवाहा दावेदार आहेत. तसेच खासदारही आहेत. यामुळे राजदने काराकाटच्या बदल्यात त्यांना उजियापूरची जागा दिली आहे. तर अहमद पटेल यांनी दक्षिण बिहारमध्ये काँग्रेसकडून अल्पसंख्यांक उमेदवारासाठी काराकाटची जागा मागितली आहे. रात्री उशिरापर्यंत लालू प्रसाद यादव यांच्यासोबत चर्चा सुरु होती. मात्र, तिढा सुटला नसल्याने शुक्रवारी सकाळच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :BiharबिहारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव