शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

“इंदिरा गांधींविरोधातील अलाहाबाद हायकोर्टाचा ‘तो’ निर्णय प्रचंड धाडसी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 10:49 IST

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

अलाहाबाद: गेल्या काही दिवसांपासून देशात घडणाऱ्या अनेकविध घटनांवर सर्वोच्च न्यायालय आणि त्यातील न्यायाधीश परखड शब्दांत मते मांडताना पाहायला मिळत आहेत. यातच आता देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी पुन्हा एक असेच मोठे वक्तव्य केले आहे. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदी राहण्यास अपात्र ठरविण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय प्रचंड हिंमतीचा होता, असा दाखला न्या. रमणा यांनी दिला आहे. (cji nv ramana says cancellation of indira gandhi election verdict of allahabad high court was courageous)

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. भारतीय न्यायव्यवस्थेचा इतिहास आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या इतिहासाचे अनेक दाखले न्या. रमणा यांनी यावेळी दिले. निवडणूक गैरप्रकार केल्याच्या आरोपांखाली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांचा निकाल हा अतिशय धाडसी निकाल होता व त्याने देशाला हलवून टाकले. यातूनच पुढे आणीबाणी लागू करण्यात आली, असे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी सांगितले.

थेट परिणाम म्हणून आणीबाणी जाहीर झाली

सन १९७५ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहनलाल सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवणारा निकाल दिल्यामुळे देशाला मोठा हादरा बसला. हा अतिशय धाडसी निर्णय होता व त्याचा थेट परिणाम म्हणून आणीबाणी जाहीर झाली, असे म्हणता येऊ शकते. त्याच्या परिणामांबाबत मी आता चर्चा करू इच्छित नाही, असे सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाला मोठा इतिहास आहे. देशातील महान कायदेतज्ज्ञ अलाहाबाद येथून देशाला लाभले, असेही न्या. रमणा यांनी यावेळी बोलताना नमूद केले.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयN V Ramanaएन. व्ही. रमणाIndira Gandhiइंदिरा गांधी