शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

“इंदिरा गांधींविरोधातील अलाहाबाद हायकोर्टाचा ‘तो’ निर्णय प्रचंड धाडसी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 10:49 IST

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

अलाहाबाद: गेल्या काही दिवसांपासून देशात घडणाऱ्या अनेकविध घटनांवर सर्वोच्च न्यायालय आणि त्यातील न्यायाधीश परखड शब्दांत मते मांडताना पाहायला मिळत आहेत. यातच आता देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी पुन्हा एक असेच मोठे वक्तव्य केले आहे. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदी राहण्यास अपात्र ठरविण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय प्रचंड हिंमतीचा होता, असा दाखला न्या. रमणा यांनी दिला आहे. (cji nv ramana says cancellation of indira gandhi election verdict of allahabad high court was courageous)

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. भारतीय न्यायव्यवस्थेचा इतिहास आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या इतिहासाचे अनेक दाखले न्या. रमणा यांनी यावेळी दिले. निवडणूक गैरप्रकार केल्याच्या आरोपांखाली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांचा निकाल हा अतिशय धाडसी निकाल होता व त्याने देशाला हलवून टाकले. यातूनच पुढे आणीबाणी लागू करण्यात आली, असे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी सांगितले.

थेट परिणाम म्हणून आणीबाणी जाहीर झाली

सन १९७५ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहनलाल सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवणारा निकाल दिल्यामुळे देशाला मोठा हादरा बसला. हा अतिशय धाडसी निर्णय होता व त्याचा थेट परिणाम म्हणून आणीबाणी जाहीर झाली, असे म्हणता येऊ शकते. त्याच्या परिणामांबाबत मी आता चर्चा करू इच्छित नाही, असे सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाला मोठा इतिहास आहे. देशातील महान कायदेतज्ज्ञ अलाहाबाद येथून देशाला लाभले, असेही न्या. रमणा यांनी यावेळी बोलताना नमूद केले.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयN V Ramanaएन. व्ही. रमणाIndira Gandhiइंदिरा गांधी