शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

“कायदा-सुव्यवस्था राखणे सरकारचे काम, आमचे नाही”; मणिपूर हिंसाचारावर CJIचंद्रचूड यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 19:14 IST

CJI D. Y. Chandrachud on Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा वापर करू नका, असा सांगत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी चांगलेच फटकारले.

CJI D. Y. Chandrachud on Manipur Violence: गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तेथील इंटरनेट व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली आहे. यातच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. 

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी मणिपूरमधील हिंसाचारासंदर्भातील काही याचिकांवर सुनावणी करताना सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम नाही. हे काम निवडून आलेल्या सरकारचे आहे. ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी कुकी गटांतर्फे युक्तिवाद करताना वाढत्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली. ईशान्येकडील राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

याचा वापर समस्यांना वाढवण्यासाठी व्यासपीठ म्हणून करू इच्छित नाही

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सुनावणी करताना, सुरक्षा किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या व्यवस्थापनात न्यायालयाच्या मर्यादा लक्षात घेऊन या समस्येकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. या कार्यवाहीचा उपयोग हिंसाचार आणि इतर समस्यांना वाढवण्यासाठी व्यासपीठ म्हणून करू इच्छित नाही. सर्वोच्च न्यायालय सुरक्षा किंवा कायदा व सुव्यवस्था चालवत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. ही एक मानवी समस्या आहे आणि त्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. या बाबी लक्षात घेऊन या प्रकरणावर सुनावणी होणार आहे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचाराला भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. राज्य सरकार हिंसाचारात सामील असलेल्या सशस्त्र गटांना पाठिंबा देत असल्याचा आरोप कॉलिन गोन्साल्विस यांनी केला. यावर, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराची जाणीव ठेवली पाहिजे. गोन्साल्विस यांना पुढील सुनावणीच्या तारखेला अधिक चांगल्या सूचना सादर कराव्यात, असे CJI चंद्रचूड यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडManipur Violenceमणिपूर हिंसाचार