शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

“कायदा-सुव्यवस्था राखणे सरकारचे काम, आमचे नाही”; मणिपूर हिंसाचारावर CJIचंद्रचूड यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 19:14 IST

CJI D. Y. Chandrachud on Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा वापर करू नका, असा सांगत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी चांगलेच फटकारले.

CJI D. Y. Chandrachud on Manipur Violence: गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तेथील इंटरनेट व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली आहे. यातच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. 

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी मणिपूरमधील हिंसाचारासंदर्भातील काही याचिकांवर सुनावणी करताना सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम नाही. हे काम निवडून आलेल्या सरकारचे आहे. ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी कुकी गटांतर्फे युक्तिवाद करताना वाढत्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली. ईशान्येकडील राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

याचा वापर समस्यांना वाढवण्यासाठी व्यासपीठ म्हणून करू इच्छित नाही

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सुनावणी करताना, सुरक्षा किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या व्यवस्थापनात न्यायालयाच्या मर्यादा लक्षात घेऊन या समस्येकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. या कार्यवाहीचा उपयोग हिंसाचार आणि इतर समस्यांना वाढवण्यासाठी व्यासपीठ म्हणून करू इच्छित नाही. सर्वोच्च न्यायालय सुरक्षा किंवा कायदा व सुव्यवस्था चालवत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. ही एक मानवी समस्या आहे आणि त्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. या बाबी लक्षात घेऊन या प्रकरणावर सुनावणी होणार आहे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचाराला भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. राज्य सरकार हिंसाचारात सामील असलेल्या सशस्त्र गटांना पाठिंबा देत असल्याचा आरोप कॉलिन गोन्साल्विस यांनी केला. यावर, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराची जाणीव ठेवली पाहिजे. गोन्साल्विस यांना पुढील सुनावणीच्या तारखेला अधिक चांगल्या सूचना सादर कराव्यात, असे CJI चंद्रचूड यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडManipur Violenceमणिपूर हिंसाचार