शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“उद्याची सकाळ ही...”; सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी CJI चंद्रचूड यांचे सूचक विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 21:22 IST

Maharashtra Politics: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याबाबत संकेत दिले असून, अवघ्या देशाचे लक्ष याकडे लागले आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकाल येऊ शकतो. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी याबाबत संकेत दिले आहेत. यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आमच्याच बाजूने निकाल लागेल, असा दावा करण्यात येत आहे. महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांकडूनही यावर प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. यातच CJI चंद्रचूड यांनी या सुनावणीाबाबत विधान केल्याचे सांगितले जात आहे. या विधानामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकाल येऊ शकतो, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड समलैंगिक विवाह प्रकरणावर सुनावणी करताना म्हणाले की, उद्या आम्ही घटनापीठाशी संबंधित दोन निकाल देणार आहोत. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना सांगितले की, समलैंगिक विवाह प्रकरणातील युक्तिवाद दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुरू होऊ शकतो, कारण सकाळची प्रचंड गर्दी असेल. उद्याची सकाळ कामांनी भरलेली आहे. घटनापीठांचे दोन महत्वाचे निकाल द्यायचे आहेत, असे CJI चंद्रचूड यांनी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सांगितले. 

पाच सदस्यीय घटनापीठ निर्णय देणार 

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर १४ फेब्रुवारी २०२३ पासून नियमित सुनावणी घेण्यात आली. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. यावर आता सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांचे पाच सदस्यीय घटनापीठ निकाल देणार आहे. अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. या घटनापीठातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती एमआर शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत.

दरम्यान, सत्तासंघर्षावरील निकाल एकमताने येण्याची शक्यता आहे. हा निकाल फक्त सरन्यायाधीश वाचून दाखवणार आहेत. त्यामुळे दोन वेगळ्या निकालांची किंवा घटनापीठात मतभेदांची शक्यता कमी आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSupreme Courtसर्वोच्च न्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड